Government Free Temples Special Report : आता मंदिरंही सरकारमुक्त होणार! पंढरपूरातून होणार सुरुवात
abp majha web team | 15 Sep 2022 07:48 AM (IST)

देशातील हिंदू देवस्थाने सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी देशभर लढा उभारला जात असताना याची सुरुवात पंढरपूरपासून करण्याची भूमिका जेष्ठ विधिज्ञ डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी जाहीर केली आणि यासाठी मुंबई उच्य न्यायालयात जनहित याचिका ७ ऑकटोबर रोजी दाखल केली जाणार आहे . मात्र मंदिर सरकारमुक्त झाल्यानंतर काय हा सर्वात मोठा कळीचा प्रश्न असला तरी मुन्हा मंदिर बडवे उत्पात यांच्या ताब्यात देण्यासाठी हा लढा नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे . बडवे उत्पात विरुद्ध राज्य सरकार हि सुरु असलेली न्यायालयीन लढाई सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानंतर थांबली असे वाटत असताना पुन्हा विठ्ठल मुक्तीचा लढा उभारल्याने वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तात याबाबत अनेक शंका असल्याचे दिसत होते.