End of Farmer Protest : सांगता... ऐतिहासिक आंदोलनाची! दिल्ली सीमेवरचा शेतकऱ्यांचा वेढा अखेर उठणार
abp majha web team | 11 Dec 2021 12:34 AM (IST)

दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाबाबत आज अखेर मोठी घोषणा झालीय. पंतप्रधानांनी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही आंदोलनावर ठाम असलेले शेतकरी अखेर दिल्लीच्या सीमांवरुन घरी जायला तयार झालेत. सरकारनं त्यांच्या काही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं अखेर हा निर्णय घेतला गेलाय. आज गाझिपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी आपलं सामानं आवरलं. तिथं उभे केलेले टेन्ट्स काढले आणि परतीचा प्रवासासाठी सगळे शेतकरी सज्ज झालेत.