शरद पवारांना पंतप्रधानपदापासून काँग्रेसनेच दूर ठेवलं? प्रफुल पटेलांच्या लेखामुळे राजकारण तापलं!
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2020 10:22 PM (IST)

मुंबई : शरद पवारांनी काँग्रेसला ताकत दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या 'दरबार राजकारणात' ही संधी हुकली. ज्यामुळं त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झालं, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारं काँग्रेस सरकार बनलं असतं पण नरसिंह रावांमुळं देवेगौडा सरकार आलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रात पवारांवर लिहिलेल्या लेखात शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाविषयी महत्वाचे भाष्य केलं आहे.