भास्कर जाधवांचं डॅमेज कंट्रोल, काल अरेरावी करणाऱ्या जाधवांकडून पूरग्रस्तांना आज धीर देण्याचा प्रयत्न
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
26 Jul 2021 08:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिपळूण : वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच पण ते अधिक सक्षम करु. अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधितांना योग्य ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.