Ramdas Kadam vs Uddhav Thackeray : बाळासाहेबांवरुन वार, आरोपांचा भडिमार Special Report
abp majha web team | 03 Oct 2025 10:06 PM (IST)
दसरा मेळाव्यात रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव दोन दिवस ठेवल्याचा दावा कदमांनी केला. "दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काढून ठेवली होती उद्धव जिनेंची," असे रामदास कदम म्हणाले. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे कपटी असल्याचा दावा करत रामदास कदमांनी त्यांना नारको टेस्टचे आव्हान दिले. "होऊन जाव दे एकदा उद्धवजींचे आणि माझे नारकोटेस होऊन जाऊ देत," असे कदम म्हणाले. शरद पवारांनीही या प्रकरणी प्रश्न विचारल्याचा उल्लेख कदमांनी केला. या आरोपांनंतर राजकारण तापले असून, भास्कर जाधव आणि नितेश राणे यांच्यासह इतर नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूचा विषय पुन्हा चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.