Aurangabad : उसासोबत स्वप्नही जळून खाक, महावितरणाला जाग कधी येणार? Special Report
abp majha web team | 02 Apr 2022 12:01 AM (IST)

बातमी मराठवाड्यातून... मराठवाड्यात आजही हजारो हेक्टरवर उसाचं पीक उभं आहे. कारखान्याचे उंबरठे झिजवूनही ते ऊस न्यायला तयार नाहीत. त्यामुळे ऊस शेतात अजूनही उभा आहे. दुसरीकडे महावितरणच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतात जळून खाक होतोय. आणि त्यासोबत शेतकऱ्यांची स्वप्नही जळून खाक होतायत. त्यामुळे आज या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. या शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष दाखवणारा आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा हा रिपोर्ट...