Ashish Shelar On Bharat Jodo Yatra Special Report : 'भारत जोडो'त काँग्रेस छोडो? शेलारांचा दावा
abp majha web team | 05 Nov 2022 11:44 PM (IST)

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता काँग्रेसमध्येही फूट पडणार का असा प्रस्न उपस्थित झालाय... आणि त्याचं कारण म्हणजे आशिष शेलारांनी माझा कट्ट्यावर केलेलं विधान... 'भारत जोडोच्या दुसऱ्या टप्प्यापर्यंत काँग्रेसचे दोन टप्पे पडलेले दिसतील असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलंय... शेलारांच्या या गौप्यस्फोटानं आता अनेक तर्कवितर्क लावले जातायत.... पहिल्या टप्प्यातील. काँग्रेस नेते दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाहीत असंही ते म्हणालेत... त्यामुळे महाराष्ट्रात राहुल गांधीयांची भारत जोडो यात्रा दाखल होताच काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरु झालीय