Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
उपमुख्यमंत्री पद हे काही घटनात्मक पद नाहीये मात्र महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेत तर विरोधी पक्ष नेत्यासाठी घटनेमध्ये तरतूद आहे पण दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. असा सगळा युक्तीवाद विरोधक गेल्या वर्षभरापासून करतायत आणि याच युक्तीवादाला विरोध करत असताना शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या मनापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आणि भास्कर जाधव यांच्या ऐवजी उद्धव ठाकरे यांना घरातलाच चेहरा विरोधी पक्ष नेते. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाची तीन अधिवेशन पार पडली आणि चौथ अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. या चारही अधिवेशनातली एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे विरोधी पक्ष नेते पदाची रिकामी खुर्ची. विधानसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव तर विधान परिषदेसाठी काँग्रेसचे सतेज पाटील यांची नाव विरोधी. पक्षनेता म्हणून विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द करण्यात आली आहेत. मात्र नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा बॉम्ब फोडला. विरोधी पक्षनेते म्हणून ठाकरेंच्या मनात भास्कर जाधवान ऐवजी दुसऱ्याच नावाचा आणि चेहऱ्याचा विचार सुरू आहे असा उदय सामंत यांचा दावा आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेते पदाच पत्र दिलेल होतं. परंतु आता ते. नाव बदलल जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूर मध्ये फार मोठ्या पद्धतीने सुरू आहे. आपल्या सडेतोड भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधवांनी उदय सामंतांचा हिशेब लगेच चुकता केला. उदय सामंतानी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचा एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत. विरोधी पक्ष नेते पद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे. माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षाकडे संख्या बळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे. भास्कर जाधवांसारखा अनुभवी आणि आक्रमक चेहरा सोडून ठाकरे विरोधी पक्षनेते पदासाठी कुणाचा विचार करत असतील या प्रश्नाच उत्तर उदय सामंतांच्या आरोपानंतर सगळेच शोधू लागले आणि हे उत्तर शोधताना आदित्य ठाकरेंकडे बोट कसं आणि कधी वळलं हे कोणालाच कळलं नाही. आदित्य ठाकरेच नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकलल जातं. याच्यात गेम वेगळा आहे लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. ठाकरे, ठाकरे किंवा आदित्य एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. विरोधी पक्ष नेतेपदी भास्कर जाधव की आदित्य ठाकरे हा निर्णय घेण्याची संधी उद्धव ठाकरेंना तेव्हा मिळेल जेव्हा विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्ष नेते पद भरण्याबाबत निर्णय घेतील. सरकारची पाप बाहेर येतील. या भीतीपोटी अध्यक्ष विरोधी पक्ष नेते पदाचा निर्णय घेत नसल्याची टीका वडेटीवारांनी केली आहे. तर विरोधकांना फक्त सरकारी बंगल्यासाठी हे पद हवंय असा पलटवाराचा गियर परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी टाकलाय. मनमाणी कारभार करून महाराष्ट्र लुटून खाण्याची इच्छा असेल तर करणार नाही. त्यांना वाटत की भीती वाटत असेल की हे विरोधी पक्षनेते पद दिलं तर आमच्या सगळ्या पापावर सगळं पाप आमची उघळे होतील. त्यांना भीती वाटत असेल तर ते देणार नाहीत. आणि जर स्वच्छ कारभार करून त्यांच्यामध्ये काही प्रामाणिकपणा असेल तर देतील, त्या विषयावर त्यांनी आरोप करण्याच्या ऐवजी राज्यातील शेतकऱ्यांना काय हवय, कष्टकऱ्यांना काय हव आहे, आमच्या महिलांना काय हव आहे, आमच्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांना काय? सभापती आहेत माननीय अध्यक्ष विधानसभेचे ते या संदर्भामध्ये निर्णय घेतील कोही संख्या बळाचे कुठले नियम नाही मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरेला मी देशातल्या नाही जिथं दोन आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेल आहे याचा रेकॉर्ड तपासा यांना रेकॉर्ड तर विधि मंडळातल काही लपलं जात नाही त्यामुळे कुठली परंपरा नसतं दोनला आम्ही देऊ शकलो तर आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं? विरोधी पक्ष नेत्याची निवड करून घेऊ शकतात, परंतु दोघेही एकमेकाकडे टोलवत आहेत, अध्यक्ष सरकारच्याकडे आणि सरकार अध्यक्ष यांच्याकडे, पण आम्ही काय बोळ्यान दूध पितो काय? इतकी वर्ष आम्ही पण विधि मंडळामध्ये काम केलेलच आहे. विरोधी पक्ष नेता हे संवैधानिक पद आहे. अर्थात त्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना बहाल करण्यात आलाय. मात्र लोकशाहीच मूल्य जपण्यासाठी संख्याबळासारख्या तांत्रिक बाबींवर बोट ठेवून विरोधी पक्ष नेते पद रिकामी ठेवणं आणि सरकारला जाब विचारणारा आवाजच अमान्य करणं योग्य नाही यावर कुणाच दुमत नसावं. वेदांत नेब आणि राजू सोनवणे