दक्षिण मुंबईत 21 इमारती धोकादायक, धोकादायक इमारतींचा प्रश्न कधी सुटणार? धोकादायक इमारतीत राहायचा अट्टहास का?
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई | 11 Jun 2021 12:05 AM (IST)

मुंबई : मालाड इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 17 जण गंभीर जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.