Saat Barachya Batmya : 7/12 : येणाऱ्या सात दिवसांत पावसाची स्थिती काय?, पाऊस कमी होण्याचं कारण काय?
abp majha web team | 21 Sep 2023 06:53 AM (IST)
महाराष्ट्रातल्या ३६ पैकी १३ जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग झालेत... जुलै, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यानं १३ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून दुष्काळाचा रेड अलर्ट देण्यात आलाय...१३ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा 30 ते 40 टक्के कमी पाऊस झालाय. हवामान विभागाकडून पावसाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे... याशिवाय हवामान विभागाकडून पुढच्या सात दिवसांत राज्यभरात पाऊस पडेल असे कुठलेही संकेत नसल्याचं सांगण्यात आलंय