#MajhaVishesh सुशांतची आत्महत्याच मग हत्येचा कांगावा का? मुंबई पोलिसांची बदनामी करणारे माफी मागणार?
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2020 06:06 PM (IST)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. "आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाचा अहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या तपासावर समाधान व्यक्त केलं होतं," असं परमबीर सिंह म्हणाले. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्या, त्या अकाऊंटची चौकशी सुरु असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. तसंच काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्याचं सिंह यांनी नमूद केलं.