या सामन्यात मुंबईनं पहिल्या दिवसअखेर तीन बाद 493 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी मुशीर खान 240, तर अयाझ खान 87 धावांवर खेळत होता.
मुशीरनं 288 चेंडूंमधली नाबाद 240 धावांची खेळी 32 चौकारांनी सजवली. सूर्यांश हेगडेनं 85 चेंडूंत 19 चौकारांसह 112 धावांची खेळी केली. अयाझ खाननं 84 चेंडूंत 14 चौकारांसह नाबाद 87 धावा फटकावल्या.