चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, आत आरसीबीचं 10 मिनिटं सेलिब्रेशन, विराट कोहलीनं काय म्हटलं? रजत पाटीदारचं कौतुक
RCB Victory Parade: एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या टीमचं जोरदार स्वागत करण्यात आलं. विराट कोहलीनं बंगळुरुच्या ऐतिहासिक विजयासंदर्भात काय म्हटलं ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Virat Kohli RCB Victory Celebration: आयपीएल 2025 चे विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयाचं सेलिब्रेशन एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलं होतं. विराट कोहली ज्यावेळी स्टेजवर पोहोचला त्यावेळी हजारो चाहत्यांनी जयघोष केला. विराटला त्याचं मनोगत व्यक्त करताना थांबायला लागलं. 18 वर्षानंतर आरसीबीनं विजेतेपद मिळवल्यानं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. यामुळं आरसीबीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. विराट कोहलीनं बंगळुरुचा कॅप्टन रजत पाटीदार याचं कौतुक केलं. रजत पाटीदारची ओळख टीमचा लीडर म्हणून करुन दिली. यानंतर रजत पाटीदारनं ट्रॉफी उंचावत बंगळुरुच्या चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये असलेल्या हजारो लोकांनी विराट कोहलीला बोलू दिलं नाही. त्यामुळं विराट कोहलीनं या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे, असं म्हटलं. वेळ कमी असल्याचं सांगत विराट कोहलीनं बोलू देण्याचा आग्रह केला.
विराट कोहली म्हणाला, मी ज्या गोष्टीपासून सुरुवात करु इच्छितो ती म्हणजे ट्रॉफी जिंकल्यानंतर आमच्या कॅप्टननं म्हटलं. आता ई साला कप नामदे नाही तर ई साला कप नामदू झालं आहे. आम्ही करुन दाखवलं आहे. हा विजय फक्त माझा नसून माझ्या सारख्या खेळाडूसाठी नव्हे तर आपल्या सर्वांचा आहे, असं विराट कोहलीनं म्हटलं.
#WATCH | #RoyalChallengersBangalore team with the #IPL2025 trophy at M Chinnaswamy Stadium in Bengaluru pic.twitter.com/I9WQwkEDvf
— ANI (@ANI) June 4, 2025
विराट कोहलीकडून रजत पाटीदारचं कौतुक
रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाचं विराट कोहलीनं कौतुक केलं आहे. विराट कोहली म्हणाला ज्यांच्या नेतृत्त्वात आरसीबीनं पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. विराट कोहलीनं रजत पाटीदार येत्या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्त्व करत राहील, असं विराट कोहलीनं म्हटलं.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयाचा जल्लोष, बाहेर चेंगराचेंगरी
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम 5 ते 6 या काळात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला उपस्थिती लावण्यासाठी मोफत आणि मर्यादित पासेससाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, 15 ते 25 जण जखमी असल्याचं समोर आलं आहे.
आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषाच्या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी झाल्यानं आनंदाला गालबोट लागलं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचा विजयी जल्लोष सुरु होण्यापूर्वी चेंगराचेंगरी झाली. यामुळं 11 जणांचा मृत्यू झाला.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटलं की मी पोलीस आयुक्त आणि इतर सर्व लोकांसोबत चर्चा केली आहे. रुग्णालयात देखील झाणार आहे, सध्या जे जखमींची देखभाल करत आहेत त्या डॉक्टरांना त्रास द्यायचा नाही. सध्या मृतांची अधिकृत संख्या सांगता येणार नाही. लोकांनी शांत राहावं, असं डीके शिवकुमार म्हणाले. कार्यक्रम केवळ 10 मिनिटात संपवण्यात आला. आम्ही स्थिती सामान्य व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. लाखो लोक आले, असं डीके शिवकुमार म्हणाले.





















