MI vs PBKS Qualifier IPL 2025 : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या निर्णायक सामन्यात श्रेयस अय्यरने तुफानी कामगिरी करत पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवलं. क्वालिफायर 1 मध्ये "लढाई हरलो, पण युद्ध नाही" अशा शब्दांत आत्मविश्वास दाखवणाऱ्या अय्यरने त्याच्या कृतीतूनच हे सिद्ध केलं की तो फक्त बोलतो नाही, तर करून दाखवतो.

मुंबई इंडियन्सने दिलेलं 204 धावांचं लक्ष्य गाठणं सोपं नव्हतं. पण श्रेयस अय्यरने संयम दाखवत 87 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याची ही खेळी केवळ रन मिळवण्यासाठी नव्हती, तर संघाला आत्मविश्वास आणि सामन्याचं चित्रच पालटणारी ठरली, ज्यामुळे पंजाब अंतिम फेरीत पोहचवली.

मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात आरसीबीशी भिडणार

पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. आता 3 जून रोजी आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज आरसीबीशी भिडणार आहे. या सामन्यात मुंबई संघाने प्रथम खेळताना 203 धावा केल्या, ज्याला उत्तर म्हणून पंजाबने केवळ 19 षटकांत लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जने अंतिम सामन्यात पोहोचण्याची ही इतिहासातील दुसरी वेळ आहे. श्रेयस अय्यरने 87 धावांची नाबाद खेळी खेळली आणि पंजाबच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

11 वर्षांनंतर अंतिम फेरीत पंजाब...

पंजाब किंग्जने 2014 मध्ये आतापर्यंतचा एकमेव आयपीएल फायनल खेळला आहे. त्या हंगामात केकेआरने पंजाबचा 3 विकेट्सने पराभव केला आणि त्यांना ट्रॉफीपासून वंचित ठेवले. श्रेयस अय्यरला जादूगार म्हणा किंवा इतर काही, त्याने 11 वर्षांनंतर अंतिम फेरीत खेळण्याचे पंजाबचे स्वप्न पूर्ण केले आहे. कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यरची ही तिसरी आयपीएल फायनल असेल.

कर्णधार म्हणून 5 वर्षांत अय्यर तिसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये 

दिल्ली कॅपिटल्सने अय्यरच्या नेतृत्वाखाली 2020 चा अंतिम सामना खेळला. त्याच वेळी, केकेआरने आयपीएल 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकली आणि आता त्याने पंजाबला अंतिम फेरीत घेऊन इतिहास रचला आहे. आयपीएल 2025 चा अंतिम सामना आता 3 जून रोजी आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाईल.