RCB vs CSK : शनिवारी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्याकडे आयपीएलप्रेमींचं लक्ष लागलेय. कारण, हा सामना प्लेऑफसाठी निर्णायक ठरणार आहे. 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगतदार लढत होणार आहे. आरसीबी आणि चेन्नईसाठी हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. प्लेऑपमध्ये प्रवेश मिळवण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरणार आहे. सोशल मीडियापासून ते कट्ट्यावर कोणता संघ टॉप 4 मध्ये जाणार याचीच चर्चा सुरु आहे. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने या सामन्याबाबत सोशल मीडियावर पोल घेतला होता. त्यामध्ये नेटकऱ्यांकडून आरसीबीला पसंती दर्शवली आहे. समालोचकांकडून चेन्नईला पसंती दर्शवलण्यात आली तर सोशल मीडियारील पोलमध्ये आरसीबीला पंसती मिळाली आहे. त्यामुळे नक्की कोण जिंकणार, याचे वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत. 


नेटकऱ्यांकडून आरसीबीला पसंती - 


18 मे रोजी आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामना सर्वात रोमांचक होणार आहे. या सामन्यावर प्लेऑफचा चौथा संघ ठरणार आहे. याबाबत स्टार स्पोर्ट्सकडून पोल घेण्यात आला होता. त्यामध्ये आरसीबीला सर्वाधिक पसंती मिळाली.  Star Sports social buzz मध्ये नेटकऱ्यांनी आरसीबीला 54.75 टक्के पसंती दर्शवली आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या मागे 45.25 टक्के लोकं आहेत. आता 18 मे रोजी काय निकाल लागतो.. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 






आरसीबी - चेन्नई सामन्यावर पावसाचे सावट - 


आरसीबी आणि चेन्नई यांच्यात 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडणार आहे. पण या दिवशी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 75 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना रद्द झाला तर आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान संपुष्टात येईल. आशा स्थितीमध्ये चेन्नईचा संघ 15 गुणांसह प्लेऑफमध्ये दाखल होईल. जर हैदराबादने दोन्ही सामने गमावले तर दिल्ली आणि लखनौ संघाला संधी असेल. 


आरसीबीला बसणार मोठा धक्का ?


मुसळधार पावसामुळे आरसीबीला मोठा धक्का बसू शकतो. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर चेन्नई आणि आरसीबीला प्रत्येकी एक एक गुण दिला जाईल. आशा स्थितीमध्ये आरसीबीचे 13 आणि चेन्नईचे 15 गुण होतील. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी फक्त एक सामना जरी जिंकला तरी त्यांचे 14 गुण होतील. आशा स्थितीमध्ये आरसीबी स्पर्धेतून गाशा गुंडाळेल.