RCB Fan Dies Of Heart Attack : विराट कोहलीला देव मानायचा...; पण आरसीबीने ट्रॉफी उचलताच मृत्यू, आनंद साजरा करताना पडला अन् पुन्हा उठलाच नाही!
मात्र संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

RCB Fan Dies Of Heart Attack : आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर आपल्या 18 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशभरात आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जवर 6 धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. ट्रॉफी जिंकताच स्टेडियममध्येच नव्हे तर सोशल मीडियावर रस्त्यांवर आणि घराघरात आरसीबीच्या विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला.
मात्र संपूर्ण देशभरात जल्लोष सुरू असताना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करताना एका तरुण चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. 25 वर्षीय एक तरुण RCBचा प्रचंड चाहता होता. तो विराट कोहलीला देव मानायचा. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आणि त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू....
ही घटना बेळगावमधील मुडलगी भागात घडली, जिथे मंजुनाथ कुंभारा वय वर्ष 25 हा आयपीएल फायनलचा निकाल लागल्यानंतर मोठ्या उत्साहात सेलिब्रेशन करत होता.पण 25 वर्षीय तरुण आरसीबीचा कट्टर चाहता होता. विजयाच्या आनंदात तो जोरदार नाचत असताना अचानक कोसळला. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तो आधीच मृत झाल्याचं घोषित केलं. प्राथमिक वैद्यकीय तपासणीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाला आहे.
Youth. Prime. Experience. All for 1⃣ Badge 🫡❤
— IndianPremierLeague (@IPL) June 4, 2025
🎥 Virat Kohli talks about pouring his soul into #RCB for 1⃣8⃣ seasons in a journey of trust, setbacks, and relentless hope that finally delivered the title 🏆#TATAIPL | #RCBvPBKS | #Final | #TheLastMile | @RCBTweets | @imVkohli
सामन्यात काय घडलं?
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 190 धावा केल्या. विराट कोहलीने संघाकडून सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय रजत पाटीदारने 26 धावा आणि जितेश शर्माने 24 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच संघ मोठा धावसंख्या उभारू शकला. बंगळूरुने दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला 20 षटकांत 7 बाद 184 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यानंतर कृणाल पांड्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि चार षटकांत दोन बळी घेतले. पंजाबकडून शशांक सिंगने 30 चेंडूंत सर्वाधिक 61 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि 6 षटकार मारले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
हे ही वाचा -





















