LSG vs RCB : विराट कोहलीनं पाया रचला, कर्णधार जितेश शर्मानं विजयाचा कळस चढवला, बंगळुरुचा लखनौवर दणदणीत विजय
RCB vs LSG : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं लखनौ सुपर जायंटसला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. जितेश शर्मा आणि मयंक अग्रवालच्या भागिदारीनं मॅच फिरली.

जयपूर : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील शेवटच्या साखळी सामन्याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने होते. आरसीबीनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौनं मिशेल मार्शचं अर्धशतक आणि रिषभ पंतच्या नाबाद शतकाच्या जोरावर 3 बाद 227 धावा केल्या.आरसीबीनं 19 व्या ओव्हरमध्येच 4 बाद 230 धावा करत विजय मिळवला. आरसीबीनं त्यांच्या 18 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या यशस्वीपणे पार केली. विराट कोहली आणि जितेश शर्माची कामगिरी बंगळुरुच्या विजयात महत्त्वाची ठरली.
विराट कोहली आणि जितेश शर्मा या दोघांनी केलेल्या अर्धशतकामुळं बंगळुरुनं विजयाच्या दिशेनं पावलं टाकलं. जितेश शर्मानं कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. लखनौच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी चांगली कामगिरी केली नाही त्यामुळं बंगळुरुनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. जितेश शर्मा आणि मयंक अग्रवाल यांच्या शतकी भागीदारी आरसीबीला विजय मिळवून दिला. जितेश शर्मानं नाबाद 85 धावांची खेळी केली. यामुळं आरसीबीनं गुणतालिकेत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं
जितेश शर्माला जीवदान
जितेश शर्मा 49 धावांवर असताना तो दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला होता. मात्र, दिग्वेश राठीचा पाय बाजूच्या रेषेला लागलेला असल्यानं फ्री हिट दिली गेली आणि जितेश शर्माला जीवदान मिळालं. विराट कोहली बाद झाल्यानंतर मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मानं संघाला विजयाजवळ
रिषभ पंतचं शतक वाया
लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 बाद 227 धावा केल्या. रिषभ पंतच्या नाबाद 118 धावा आणि मिशेल मार्शच्या 67 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला. ब्रीटझके यानं 14, निकोलस पूरन यानं 13 धावा केल्या. रिषभ पंतच्या शतकामुळं लखनौ सुपर जायंटसनं 3 बाद 227 धावा केल्या. मात्र,विराट कोहली, फिल सॉल्ट, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा यांच्या दमदार फलंदाजीपुढं लखनौचे गोलंदाज अपयशी ठरले. विराट कोहलीनंतर जितेश शर्मानं षटकार चौकार मारत संघाला विजयाजवळ पोहोचवलं. लखनौचे फलंदाज अपयशी ठरल्यानं रिषभ पंतचं शतक वाया गेलं. लखनौच्या गोलंदाजांची खराब कामगिरी आणि खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
बंगळुरु टॉप 2 मध्ये
बंगळुरुच्या विजयानं प्लेऑफमधील लढती ठरल्या आहेत. क्वालिफायर 1 मधील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅच 29 मे रोजी होणार आहे. तर, एलिमिनेटरमधील लढत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. एलिमिनेटर मधील विजेता संघ क्वालिफायर 1 च्या पराभूत संघासोबत क्वालिफायर 2 चा सामना खेळेल.





















