IPL 2025 New Schedule Updates : भारत-पाक युद्ध नाही तर 'या' कारणामुळे बदलणार आयपीएल फायनलचे ठिकाण? बीसीसीआयचा मोठा निर्णय, जाणून कारण
IPL 2025 Schedule Updates News : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रत्येक वेळी आयपीएलचा अंतिम सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळला जातो.

IPL 2025 New Schedule Updates Final Venue : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रत्येक वेळी आयपीएलचा अंतिम सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळला जातो. गेल्या वर्षी केकेआरने ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे यावर्षी आयपीएल 2025 चा अंतिम सामना कोलकातामध्ये फिक्स होता. पण नव्या अपडेटमध्ये त्यात काही बदल झाल्याच्या बातम्या आहेत.
अंतिम सामना कोलकातामध्ये होणार नाही का? (IPL 2025 Final Venue)
पीटीआयच्या वृत्तानुसार, खराब हवामान हे ठिकाण बदलण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी आघाडीवर जाते. आयपीएलमध्ये गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर अंतिम सामना होणे ही सामान्य गोष्ट आहे. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे घरचे ठिकाण असलेल्या कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर 25 मे रोजी अंतिम सामना होणार होता.
16 किंवा 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आयपीएल?
भारत आणि पाकिस्तानमधील सीमा तणावामुळे 9 मे पासून लीग एक आठवड्यासाठी स्थगित असल्याने 25 मे रोजी अंतिम सामना आयोजित करणे अशक्य आहे. दोन्ही देशांनी 10 मे रोजी युद्धबंदीवर सहमती दर्शविली. पण, परदेशी खेळाडूंची उपलब्धता आणि इतर लॉजिस्टिक समस्यांनंतर आयपीएल 16 किंवा 17 मे रोजी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
🚨 IPL 2025 UPDATES 🚨 [Devendra Pandey From Express Sports]
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2025
- BCCI is planning to extend the IPL till May 30th.
- Chennai, Bengaluru & Hyderabad likely to be the venues from May 16th.
- The new schedule might be released to franchises by Sunday night. pic.twitter.com/yZzvtST0z3
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला काय म्हणाले?
पीटीआयशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, 'आतापर्यंत आयपीएलचे उर्वरित सामने घेण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. बीसीसीआय अधिकारी सर्व शक्यतांबाबत सारासार विचार करत आहेत. स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आणि काल युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. स्पर्धा लवकरच पुन्हा सुरू होईल.
आयपीएलचा अंतिम सामना कुठे होणार?
गेल्या काही दिवसापासून कोलकात्यामध्ये पावसाची ये-जा सुरू असल्याने अंतिम सामन्याला त्याचा फटका बसू शकतो. हीच शंका व्यक्त करून आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल अंतिम सामना इतरत्र हलवू शकते. या हंगामात कोलकातामध्ये पावसामुळे एकदा सामना रद्द करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील दुसऱ्या डावातील साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत अहमदाबादची अंतिम फेरीसाठी निवड होऊ शकते.
हे ही वाचा -





















