India vs Australia World Cup Final 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 240 धावांत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज डावाच्या सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसून आले. भारताकडून केएल राहुलने 66 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय विराट कोहलीने 54 धावा केल्या. आता, या कमी धावसंख्येचा बचाव करण्यासाठी, भारताला कपिल देवच्या संघाने 1983 च्या विश्वचषक फायनलमध्ये 183 धावांचा बचाव करून जे पराक्रम केले होते तेच करणे आवश्यक आहे.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ सुरुवातीपासूनच गडबडताना दिसला. मात्र, कर्णधार रोहित शर्माने 151.61 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 47 धावांची इनिंग खेळून संघाला आवश्यक ती सुरुवात करून दिली. भारताने 10 षटकात 2 विकेट गमावत 80 धावा केल्या होत्या, परंतु यानंतर हळूहळू संघावर दडपण येऊ लागले. 


चांगली सुरुवात झाली नाही


अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. भारताने 5 व्या षटकातच शुभमन गिलच्या (04) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील भागीदारी अवघ्या 46 धावांपर्यंत (32 चेंडू) पोहोचली होती, तेव्हा 10व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तुफानी शैलीत खेळणारा हिटमॅन 31 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला.


11व्या षटकात 04 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर श्रेयस अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर रोहित शर्माच्या विकेटमधून भारतीय संघ सावरू शकला नाही. अय्यरला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची (109 चेंडू) भागीदारी केली. ही भरभराटीची भागीदारी पॅट कमिन्सने विराट कोहलीला 29व्या चेंडूवर टाकून मोडली. कोहली 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा करून बाद झाला. यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेला रवींद्र जडेजा 36व्या षटकात वैयक्तिक 09 धावांवर हेझलवूडचा बळी ठरला. यानंतर चांगल्या खेळीच्या दिशेने वाटचाल करणारा केएल राहुल 42 व्या षटकात 1 चौकाराच्या मदतीने 66 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलला मिचेल स्टार्कने बाद केले. त्यानंतर 44व्या षटकात मोहम्मद शमीला मिचेल स्टार्कने 06 धावांवर बाद केले, 45व्या षटकात अॅडम झाम्पा 01 धावांवर बाद झाला, 48व्या षटकात हेझलवूड 18 धावांवर बाद झाला आणि 50व्या षटकात कुलदीप यादव बाद झाला. 10 धावांवर धावबाद झाला.


इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी धुव्वा उडवला!


दरम्यान, याच वर्ल्डकपमध्ये साखळी सामन्यात फक्त 230 धावांचे आव्हान असूनही टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी धुव्वा उडवला होता. जसप्रित बुमराहने सलग दोन चेंडूवर इंग्लंडला हादरे दिल्यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नव्हता. मोहम्मद शमीने सलग दुसऱ्या सामन्यात घातक मारा करत चार विकेट घेतल्या आणि इंग्रजांचा बाजार उठवण्यात मोलाची भूमिका बजावली. 


छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाला जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या, पण त्यानंतर जे घडलं ते इंग्लंडसाठी आश्चर्यचकित करणारे होते. डेव्हिड मलान (16) आणि जो रूट (0) यांना बुमराहने लागोपाठ दोन चेंडूत बाद केले, तर शमीने बेन स्टोक्स (0) आणि जॉनी बेअरस्टो (14) यांना बाद करून ब्रिटीशांची अवस्था बिघडवली. कर्णधार जोस बटलर 10 धावांवर कुलदीप यादवचा बळी ठरला तेव्हा इंग्लंडच्या सर्व उत्साहावर विरजण पडले.


शमी आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीला कुलदीप आणि रविंद्र जडेजाची सुद्धा दमदार साथ मिळाली. शमीने चारपैकी तीन क्लीनबोल्ड विकेट घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. बुमराहने तीन विकेट घेतल्या. इंग्लंडच्या दहापैकी पाच फलंदाजांच्या शमी आणि बुमराहने दांड्या गुल करत इंग्रजांना जागा दाखवून दिली. लखनौच्या संथ खेळपट्टीवर प्रथम खेळून भारतीय संघाने केवळ 229 धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ हे लक्ष्य सहज गाठेल असे वाटत होते. पण मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या घातक गोलंदाजीपुढे इंग्लंडचा संघ गारद झाला आणि संपूर्ण संघ केवळ 129 धावांवर गारद झाला.


इतर महत्वाच्या बातम्या