चेन्नई : तब्बल 12 वर्षांचा प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्डकप ( ICC Cricket World Cup 2023) जिंकण्याच्या इराद्याने आज आपला श्रीगणेशा करत आहे. टीम इंडियाची सलामीची लढत आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia)  चेन्नईतील चेपाॅक मैदानावर होत आहे. या लढतीची उत्सुकता देशभरात शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टीम इंडियाने केलेली कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाला या सामन्यात टीम इंडिया मात देणार का? याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष आहे. 


नुकत्याच पार पडलेल्या मालिकेमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) धूळ चालली होती. त्यामुळे एकंदरीत दोन्ही संघांना एकमेकांच्या परिस्थितीचा अंदाज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारते याकडे आता लक्ष आहे. दोन्ही संघांची वर्ल्डकपमधील कामगिरी तशी दमदारच राहिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातील वर्ल्डकपच्या 18 सामन्यांमधील 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने 22 सामन्यांमधील 15 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. 


गेल्या 27 वर्षात सलामीला ऑस्ट्रेलिया कधीच पराभूत नाही


दुसरीकडे, सर्वाधिक वर्ल्डकपवर नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने (They won their first match of the World Cup in 6 straight editions) 1996 पासून ते आतापर्यंत कधीच वर्ल्डकपची सलामीची मॅच गमावलेली नाही. त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चालत विजयाचा श्रीगणेशा केला आहे. त्यामुळे अशा बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर आज टीम इंडिया 27 वर्षांची पहिल्या लढतीमधील विजयी मालिका मोडित काढणार की ऑस्ट्रेलिया बाजी मारणार? याचे उत्तरही आज मिळणार आहे. यापूर्वी 1996 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत झाला होता. मात्र, त्यानंतर आजवरच्या सलग सहा वर्ल्ड कपमध्ये आपली पहिली मॅच जिंकूनच दमदार सलामी दिली आहे. यामध्ये 1999, 2003, 2007, 2011, 2015, 2019 अशा सलग सहा वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाला मात दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या