Ind Vs Pak Abhishek Sharma: भारत-पाक सामन्यापूर्वी मोहम्मद आमिरने टीम इंडियाला डिवचलं, म्हणाला, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर...'
Ind Vs Pak Abhishek Sharma: टी-20 वर्ल्ड कप हाय व्होल्टेज सामान्यकडे साऱ्याचं लक्ष लागलं असताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने भारतीय खेळाडू अभिषेक शर्मावर टीका केलीय.

Ind Vs Pak Abhishek Sharma : टी 20 वर्ल्ड (T20 World Cup 2026) कपमध्ये भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) रविवारी आमने सामने येणार आहेत. ही मॅच श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या हाय व्होल्टेज सामान्यकडे साऱ्याचं लक्ष लागलं असताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) भारतीय खेळाडू अभिषेक शर्मावर (Abhishek Sharma) टीका केली आहे. (Mohammad Amir on Abhishek Sharma)
Mohammad Amir on Abhishek Sharma : अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर
यावेळी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर म्हणाला कि, अभिषेक शर्मा इतकाही चांगला बॅटसमन नाही, तो फक्त स्लॉगर आहे. त्याला एका साध्या प्लाननेही बाद करता येईल. टी-20 2026 च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी, आमिरने एका पाकिस्थानी टीव्ही शोमध्ये सांगितले की, भारतीय सलामीवीर अभिषेकमध्ये सातत्य नाही आणि तो तांत्रिकदृष्ट्या चांगला फलंदाज देखील नसल्याचं माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद अमीर म्हणालाय.
भारत आणि पाकिस्तान सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या गट-अ मध्ये आहेत, त्यांनी त्यांचे सुरुवातीचे दोन सामने जिंकले आहेत. आता, या गटातील दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतील. यापूर्वी, मोहम्मद अमीरने त्याच्या विधानाने नवा वाद निर्माण केलाय. अभिषेक आठ पैकी एका सामन्यात कामगिरी करतो, तर इतर सामन्यांमध्ये मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. कदाचित मॅच फिक्सर्स विसरले असतील की अभिषेक सध्या आयसीसी रँकिंगमध्ये जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज आहे. आठ पैकी फक्त एका सामन्यात कामगिरी करूनही त्याने हे स्थान मिळवले. असेही मोहम्मद अमीर म्हणाला.
Mohammad Amir on Abhishek Sharma : मोहम्मद अमीरने अभिषेक शर्माबद्दल नेमकं काय म्हटलं?
मोहम्मद आमिर म्हणाला, "अभिषेक शर्मा एक स्लॉगर खेळाडू आहे. तो फक्त प्रत्येक चेंडू मारू इच्छितो. जर चेंडू त्याच्या बॅटला लागला तर ते झाले; अन्यथा, अपयशाची शक्यता जास्त असते. अभिषेक आठ डावांपैकी फक्त एका डावात धावा करतो. इतर डावांमध्ये तो 10, 15, 20 किंवा 0 धावा करतो. तो फक्त तिथेच उभा राहतो आणि धावा करतो. तो तांत्रिकदृष्ट्या चांगला फलंदाज नाही."
आमिर पुढे म्हणाला, "अभिषेक शर्मा हाय रिस्क क्रिकेट खेळतो. जर तुम्हाला त्याला अडकवायचे असेल तर एका फिल्डरला डीप कव्हरमध्ये ठेवा आणि त्याच्या शरीरावर गोलंदाजी करा. दुसरी गोष्ट म्हणजे स्लो बॉल." किंबहुना, आमिर कदाचित विसरला असेल की अभिषेक हा जगातील नंबर वन टी-20 फलंदाज आहे आणि त्याला हे देखील माहित आहे की गोलंदाज त्याच्याविरुद्ध विविधता वापरतील. अभिषेक न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान म्हणाला होता, "मला माहित आहे की टी-20 विश्वचषकात गोलंदाज त्याला जास्त वेग देणार नाहीत, परंतु मला ते जाणवले आहे आणि मी त्याचा सराव करत आहे." त्यामुळे आता मोहम्मद अमीरच्या या टीकेला अभिषेक शर्मा आपल्या फलंदाजीतून कशा प्रकारे उत्तर देतात हे उद्याच्या सामन्यात स्प्ष्ट होणारच आहे. मात्र या टाकेनंतर क्रिक्रेटविश्वात एकच चर्चा रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























