कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळताना धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतरच्या सत्रांमध्ये धवनला विश्रांती देण्यात आली. यापूर्वी सलामीवीर के. एल. राहुल दुखापतीमुळे अगोदरच बाहेर झाला आहे. त्यानंतर आता धवनलाही बाहेर जावं लागणार आहे.
धवन बाहेर झाल्यास सलामीवीर म्हणून गंभीरला संधी मिळू शकते. गंभीरने तब्बल दोन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन केलं आहे. त्यामुळे गंभीरकडे स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे.