World Test Championship Final Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 11 जून 2025 रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरू शकेल का, हा प्रश्न आहे. यासोबत भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकू शकेल का? खरंतर, चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव केला. यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये भारत 71.67 च्या विजयी टक्केवारीसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याच वेळी, आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील अंतर 9.16 टक्के झाले आहे. ऑस्ट्रेलियाचे 62.50 टक्के गुण आहेत. मात्र, आता भारताचे समीकरण काय? खरंतर, भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी 9 कसोटी खेळायच्या आहेत, त्यापैकी 5 जिंकायच्या आहेत. जर टीम इंडिया 4 कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरली आणि 1 कसोटी अनिर्णित राहिली, तरीही ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. पण, एक गोष्ट जी चिंता वाढवणार आहे, ती म्हणजे भारताचे पुढील सामने तगड्या संघांसोबत आहेत.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीशिवाय, भारतीय संघाला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळायची आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ भारत दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. वास्तविक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खूप महत्त्वाची ठरणार आहे, पण यावेळी पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारत अंतिम फेरीत खेळणार हे जवळपास निश्चित आहे.


हे ही वाचा -


Drona Desai Record : 7 षटकार, 86 चौकार अन् 498 धावांची मॅरेथॉन इनिंग; 18 वर्षीय पठ्ठ्याचा धमाका, 'रेकॉर्ड बुक'मध्ये नोंद


Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने केली मुंबईत करोडोंची गुंतवणूक; आईसोबत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत किती?


Ind vs Ban: टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष