South Africa beat India 2nd T20 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात 51 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुल्लापुर येथे झालेल्या या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार सूर्याचा हा निर्णय टीम इंडियालाच महागात पडला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर टीम इंडिया 19.1 षटकांत केवळ 162 धावांवर ऑलआऊट झाली. या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव स्पष्टपणे नाराज दिसत होता.

Continues below advertisement

सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav Ind vs Sa 2nd T20 )

Continues below advertisement

पराभवानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, “खरंतर, आम्ही आधी फलंदाजी केली असती तर बरं झालं असतं. कारण आधी गोलंदाजी करून फार काही करता आलं नाही. परंतु नंतर आपल्याला जाणवले की या विकेटवर चांगल्या लेंथने गोलंदाजी करणे किती महत्त्वाचे आहे. पण ठीक आहे… हा शिकण्याचा टप्पा आहे. चुका लक्षात घेत पुढे जाणे महत्त्वाचे.

दव पडल्याने टीम इंडियाचा खेळ खराब झाला?

मुल्लानपूरवरही दव पडल्याने परिणाम झाला. पण, टीम इंडिया त्याचा फायदा घेऊ शकली नाही. दव पडण्याबाबत सूर्यकुमार यादव म्हणाले, "काही दव पडला होता आणि जेव्हा आमची योजना काम करत नव्हती, तेव्हा आम्हाला वेगळी योजना स्वीकारायला हवी होती, पण तीच चूक झाली. पण हरकत नाही, हा शिकण्याचा भागच आहे. दुसऱ्या डावात त्यांनी कशी गोलंदाजी केली, त्यातून आम्ही बरेच काही शिकलो. पुढच्या सामन्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू.

शुभमन गिलचं नाव घेत सूर्या काय म्हणाला? 

वरच्या फळीच्या फलंदाजांच्या अपयशाबद्दल सूर्या म्हणाला, "शुभमन आणि मी चांगली सुरुवात करायला हवी होती, कारण आपण नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही. तो उत्तम खेळत आहे, पण त्याचा दिवसही वाईट असू शकतो. पण ठीक आहे, शुभमन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तरी मला जबाबदारी घ्यायला हवी होती. जर तसे झाले असते तर पाठलाग करणे सोपे झाले असते. आता चुका लक्षात घेऊन पुढच्या सामन्यात सुधारण्याचा प्रयत्न करू.

हे ही वाचा -

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी