एक्स्प्लोर

Ranji Trophy 2025 : विराट, रोहित ढेपाळले; पुजारा, रहाणेने लक्ष वेधले, आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल अचंबित, BCCI किती दिवस करणार अन्याय?

रणजी ट्रॉफी हंगामात विराट कोहली, रोहित शर्मा पुनरागमनात अपयशी ठरला असला तरी, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी मैदान गाजवले.

Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफी हंगामात विराट कोहली, रोहित शर्मा पुनरागमनात अपयशी ठरला असला तरी, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी मैदान गाजवले. चेतेश्वरने 99, तर अजिंक्य रहाणने 96 धावांची खेळी केली. त्यामुळे दोघांचाही पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघासाठी विचार व्हावा, अशी मागणी चाहत्यांनी सोशल मीडियावर केली. पण दोघांनाही कोणतेही कारण न देता टीम इंडियामधून बाहेर केले होते. पण रणजी ट्रॉफीमध्ये या दोन्ही खेळाडूंनी बॅटने कहर करून पुन्हा एकदा बीसीसीआयला आरसा दाखवला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारा-रहाणेच्या अनुपस्थितीचे परिणाम टीम इंडियाला आधीच भोगावे लागले आहेत. एकेकाळी टीम इंडियाचा कणा म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही खेळाडू जवळजवळ एक वर्षापासून टीम इंडियाचा भाग नाहीत. पण त्याच्या बॅटची ताकद आजही तितकीच दिसते.

विशेष म्हणजे अलिकडेच जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या रणजी ट्रॉफीमध्ये रोहित शर्माला पहिल्या डावात फक्त 3 धावा करता आल्या. दुसऱ्या डावात 28 धावा करून तो बाद झाला. याचा अर्थ असा की एक गोष्ट स्पष्ट आहे की जिथे रोहित आणि कोहली अपयशी ठरले, तिथे टीम इंडियाच्या बाहेर असलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी चमत्कार केले.

चेतेश्वर पुजारा 99 धावांवर आऊट

सौराष्ट्र आणि आसाम यांच्यातील रणजी सामना 30 जानेवारीपासून राजकोटमध्ये सुरू झाला. या सामन्यात शुक्रवारी टीम इंडियाचा स्टार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा 99 धावांवर बाद झाला. पुजाराने गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालेले नाही. 

रहाणेचे शतक हुकले...

मेघालय आणि मुंबई यांच्यातील रणजी सामना वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे. या सामन्यात मेघालय संघ 86 धावांवर गारद झाला. यानंतर, मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने या सामन्यात शानदार खेळी केली आणि शुक्रवारी तो 96 धावा करून बाद झाला. टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने 177 चेंडूंच्या आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार मारला. रहाणे बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. रहाणेने जुलै 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.

या रणजी हंगामात रहाणे-पुजाराची कामगिरी

अजिंक्य रहाणेने या रणजी हंगामात (2024-25) 7 सामन्यांपैकी 10 डावात आतापर्यंत 298 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 33.11 आहे. तर चेतेश्वर पुजाराने 6 रणजी सामन्यांमध्ये 46.75 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत.

बीसीसीआय किती दिवस करणार दुर्लक्ष?

पुजारा आणि रहाणे हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा काढताना दिसतात, त्यामुळे बीसीसीआय त्यांना किती काळ दुर्लक्षित करेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यांच्या कामगिरीकडे पाहता, दोन्ही दिग्गजांना टीम इंडियामध्ये आणखी एक संधी मिळू शकते. त्याच वेळी, रोहित, विराट, जैस्वाल सारखे अनुभवी खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये अपयशी ठरले आहेत.

हे ही वाचा -

Harshit Rana Concussion Substitute Controversy : टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! इंग्लंडचा कर्णधार संतापला; भारताच्या स्टार खेळाडूने सुद्धा उपस्थित केला 'गंभीर' प्रश्न

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Embed widget