India vs Bangladesh Asia Cup 2025 : 24 सप्टेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-4 फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने तूफानी कामगिरी करत विजय मिळवला. बांगलादेशच्या बाजूने कोणताही खेळाडू विशेष छाप पाडू शकला नाही. सुरुवातीला खराब गोलंदाजी आणि त्यानंतर निराशाजनक फलंदाजीमुळे बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना तब्बल 41 धावांनी जिंकला. या विजयांनंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (What did say Indian captain Suryakumar Yadav?)
सूर्यकुमार यादव म्हणाला की, या स्पर्धेत आम्हाला अजूनपर्यंत पहिल्यांदा फलंदाजी करता आली नव्हती. ओमानविरुद्ध एकदा आम्ही पहिली फलंदाजी केली होती, पण सुपर फोरमध्ये आम्हाला पहिली फलंदाजी करून बघायची होती. टीमच्या गोलंदाजीच्या कामगिरीवर नजर टाकली तर आमच्याकडे एक डावखुरा फिरकीपटू आणि एक लेग स्पिनर होता. त्या परिस्थितीत 7 ते 15 षटकांच्या दरम्यान दुबे अगदी योग्य ठरला असता, पण तसं जमलं नाही. क्रिकेटमध्ये असं घडतंच... जर आऊटफिल्ड अजून चांगली असती तर आमचा डाव 180-185 धावांपर्यंत गेला असता. पण आमच्याकडे जी गोलंदाजी आहे, त्यामध्ये आम्ही जर 12-14 चांगली षटके टाकली, तर बहुतांश वेळा विजय आमचाच होतो.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 37 चेंडूत 75 धावा केल्या. शुभमन गिलनेही 19 चेंडूत 29 धावा केल्या. दरम्यान, हार्दिक पांड्याने खालच्या मधल्या फळीत 29 चेंडूत 38 धावा करत आपली ताकद दाखवली. सैफ हसन व्यतिरिक्त, बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाने लक्षणीय कामगिरी केली नाही. सैफने 51 चेंडूत 69 धावा केल्या. त्याच्याशिवाय, बांगलादेशचा दुसरा कोणताही फलंदाज स्वतःला खेळपट्टीवर टिकवून ठेवू शकला नाही. बांगलादेशचा संघ 19.3 षटकांत 127 धावांवर ऑलआऊट झाला.
हे ही वाचा -