Team India Champions T20 World Cup 2026 : विश्वचषक जिंकला… अन् सूर्या झाला भावुक! नरेंद्र मोदी स्टेडियमची माती कपाळावर लावून केला सलाम, Video
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.

Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत 2026 चा टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत भारताने केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही रचले. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास घडवला.
A TEAM OF WINNERS 🥇
— ICC (@ICC) March 8, 2026
Suryakumar Yadav-led India etch their name in history as they become the first team to defend the #T20WorldCup 🙌
Made with Google Gemini pic.twitter.com/yZdhwp8R8Z
विश्वचषक जिंकला… अन् सूर्या झाला भावुक!
या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. विजयाचा आनंद साजरा करताना सूर्यानं अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मैदानाची माती उचलून ती कपाळावर लावली आणि मैदानाला सलाम केला. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
The energy in the stands, the belief on the field, Team India feel the love. 👏💙#INDvNZ #Champions pic.twitter.com/FvNmsRQPuO
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
सलग दोनदा टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही संघाला आपले विजेतेपद राखता आले नव्हते. मात्र, 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियाने हा विक्रम मोडला. भारत आता सलग दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे.
Make it THREEEEEEE! 🏆🏆🏆#TeamIndia have repeated & defeated history by becoming the first team to 👇
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
▪️ Win back-to-back titles
▪️Three titles
▪️Win the title at home#T20WorldCup #INDvNZ pic.twitter.com/bQlm5t0D3k
टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश
या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे होते आणि घरच्या मैदानावर खेळताना भारतीय संघाने इतिहास रचला. आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाला टी-20 विश्वचषक जिंकता आला नव्हता. मात्र, न्यूझीलंडचा पराभव करत भारताने हा अडथळाही दूर केला आणि यजमान देश म्हणून टी-20 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🇮🇳#TeamIndia clinch a record 3️⃣rd ICC Men's #T20WorldCup title 🏆
— BCCI (@BCCI) March 8, 2026
Take. A. Bow 🫡#MenInBlue | #Final | #INDvNZ pic.twitter.com/nml1AZY5tK
टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडवर पहिलाच विजय
टी-20 विश्वचषकात भारताला यापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध कधीही विजय मिळवता आला नव्हता. 2007, 2016 आणि 2021 या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारतावर मात केली होती. मात्र, 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत हा किवी जादू अखेर मोडून काढला. दोन्ही संघांमधील टी-20 विश्वचषकातील हा चौथा सामना होता आणि यात भारताने पहिल्यांदाच बाजी मारली.
हे ही वाचा -





















