T20 World Cup: टी -20 वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सामन्याआधी भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल (IPL) खेळण्याच्या अनुभवावाचा फायदा मिळेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकातील कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या बहुप्रतिक्षित सामन्यात पूर्वीचा अनुभव चांगल्या स्थितीत राहण्यास मदत करेल, असे तो म्हणाला.


भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण
जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक असलेला भारत रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही पाकिस्तानकडून हरला नाही. रैनाने इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) साठी आपल्या स्तंभात लिहिले आहे, की "आयपीएलचे आभार, आमच्या संघाला UAE मध्ये खेळण्याचा आणि तिथल्या परिस्थितीशी सामना करण्याचा खूप अनुभव आहे, ज्यामुळे ते अधिक चांगल्या स्थितीत राहतील." तो म्हणाला की, भारतीय संघात युवा आणि अनुभव यांचं चांगलं मिश्रण आहे आणि यातील अनेकजण स्वबळावर सामने जिंकण्यास सक्षम आहेत.


''विराट आणि बाबर आझम दोघेही चांगले कर्णधार''
माजी फलंदाज रैनाचा असा विश्वास आहे की भारतीय दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे विराटसह संघात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासारखे अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. त्यामुळे संघ खूप मजबूत आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाल्यानंतर भारतीय खेळाडू विश्वचषकात खेळणार आहेत. भारतातील कोविड-19 महामारीमुळे, ते UAE मध्ये आयोजित करण्यात आले होते. रैनाला माहित आहे की विराट कोहली आणि बाबर आझम हे दोघेही खूप भावनाप्रधान असलेले कर्णधार असून त्यांना स्वतः उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण घालून नेतृत्व करायला आवडते. या सामन्याचे महत्त्व समजून घेतल्यास दोघेही उत्कटतेने परिपूर्ण असतील. बाबर टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील अव्वल फलंदाज आहे. कोहलीप्रमाणेच त्याने हे देखील सिद्ध केले आहे की महान फलंदाजी आणि नेतृत्व एकत्रित करता येते. बाबरला मदत करण्यासाठी संघात मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिकसारखे अनुभवी खेळाडू आहेत.


सुरेश रैनाचे म्हणणे आहे की, एका बाजूला विराट आणि दुसरीकडे बाबर असल्याने हा खूप चांगला सामना असेल. ते दोघे खरोखर प्रतिस्पर्धी खेळाडू आहेत ज्यांना प्रतिस्पर्धी काय आहे हे माहित आहे. रैना स्वतः टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यांचा भाग होता.