एक्स्प्लोर

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : विश्वचषक जिंकला अन् संजू, बुमराहबद्दल कर्णधार सूर्याने मनातलं सगळं बोलून टाकलं, कुणाला दिले विजयाचे श्रेय? थेट बोलला

Suryakumar Yadav Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले.

Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : भारताने पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटच्या जगात आपला दबदबा सिद्ध केला आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (Ind vs NZ Final) तब्बल 96 धावांनी पराभव करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयासह भारत सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा इतिहासातील पहिलाच संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने दमदार खेळ करत मोठा धावांचा डोंगर उभा केला. संजू सॅमसनने शानदार 89 धावांची खेळी करत संघाला सुरुवात करून दिली. त्याला अभिषेक शर्माने 52 धावांची आणि ईशान किशनने 54 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. या तिघांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे केले. तर भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav Ind vs NZ Final T20 World Cup 2026)

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्या तो म्हणाला की, “मला वाटतं हे पूर्णपणे मनात बसायला अजून थोडा वेळ लागेल, पण आज जे घडलं त्याबद्दल आनंद आहे. हा प्रवास खूप मोठा होता. 2024 च्या वर्ल्ड कपनंतर हा प्रवास सुरू झाला. त्या वेळी बीसीसीआयने, जय शाह भाई, त्यावेळचे सचिव, रोहित शर्मा भाई आणि इतर सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. या शानदार संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानंतर हा प्रवास करत आम्ही पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आलो आणि इथे हा किताब जिंकला. ही भावना खूप खास आहे.

फेव्हरेट असण्याचा दबाव कसा दूर ठेवला?

पुढे तो म्हणाला की, आम्हाला माहित होतं की गेल्या दोन वर्षांत आम्ही सातत्याने चांगला क्रिकेट खेळत होतो. सगळं योग्य दिशेने चाललं होतं. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ज्या चांगल्या सवयी आम्ही लावल्या होत्या, त्याच पुढेही कायम ठेवायच्या होत्या. मी पोरांना नेहमी सांगत होतो की वर्ल्ड कप जिंकण्याची भावना काय असते, द्विपक्षीय मालिकांमध्ये आपण कसं खेळायचं, आणि त्या विजयाची चव पुढेही कशी कायम ठेवायची. संघातील प्रत्येकाने ती गोष्ट मनापासून स्वीकारली आणि मुलांनी त्यावर उत्तम प्रतिसाद दिला.

खेळाडूंवर विश्वास ठेवण्याबाबत काय म्हणाला सूर्या?

सूर्यकुमार यादव म्हणाला की, खेळाडू काय करू शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. संजू, अभिषेक आणि वरुण यांच्यात सामना जिंकून देण्याची क्षमता आहे, हे मला ठाऊक होतं. संजूसाठी संघात येण्याची ही योग्य वेळ होती. वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा हे जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू आहेत. त्यांच्यात काहीतरी खास आहे, हे आम्हाला नेहमीच माहिती होतं. आणि फायनलसारख्या मोठ्या मंचापेक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठी यापेक्षा मोठी संधी नसते. तसंच जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल हे खेळाडू खूप वर्षांपासून संघात आहेत. सपोर्ट स्टाफसह ते सगळे एकमेकांची काळजी घेत आले आहेत. त्यामुळे हा विजय खूप खास आहे.

बुमराहबद्दल सूर्यकुमार यादव काय म्हणाला? (Suryakumar Yadav on Jasprit Bumrah)

संघात बुमराह असण्याबद्दल सूर्यकुमार यादव म्हणाला, मी आधीही सांगितलं आहे, जसं संजूने मागच्या सामन्यानंतर सांगितलं होतं की त्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार तो जसप्रीत बुमराहला द्यायला तयार आहे. बुमराह हा ‘एक पिढीत एकदाच जन्माला येणारा’ गोलंदाज आहे. सध्या तर मी त्याला देशाची अमूल्य संपत्ती म्हणेन. त्याला नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हे चांगलं माहिती आहे. तो या खेळात सर्वोत्तम आहे आणि आशा आहे की तो असाच पुढेही संघासाठी चमकदार कामगिरी करत राहील. धन्यवाद, अहमदाबाद.”

हे ही वाचा -

T20 World Cup 2026 Prize Money : विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, न्यूझीलंडला किती रुपये मिळाले?, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियानेही कमावले कोट्यवधी

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SHR vs CSK Live Update IPL 2026 : अभिषेक-क्लासेनची तुफानी फटकेबाजी, तरीही हैदराबादचा गाडा 200 च्या आतच अडकला, चेन्नईला मिळालं 195 धावांचं 'टार्गेट'
SHR vs CSK Live Score : अभिषेक-क्लासेनची तुफानी फटकेबाजी, तरीही हैदराबादचा गाडा 200 च्या आतच अडकला, चेन्नईला मिळालं 195 धावांचं 'टार्गेट'
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
RCB vs DC IPL 2026 : 12 षटकांत 122/3... तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण 'व्हिलन'?
12 षटकांत 122/3... तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण 'व्हिलन'?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Embed widget