IND vs SA : निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफिक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमीत कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त असल्यामुळे केशव महाराज दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून त्याने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 


दक्षिण आफ्रिकानं संघात तीन बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकाकडून टेम्बा बावुमा, तरबेज शम्सी आणि मार्को जेनसन यांना आराम देण्यात आलाय. त्यांच्याजागी ट्रस्टन स्टब्स, रीजा हेंड्रिक्स आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिलेय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. विजयी संघ कायम ठेवण्यात आलाय. 


भारताची प्लेईंग 11 - 
ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल


दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 - 
क्विंटन डिकॉक (विकेटकिपर),  रिजा हेंड्रिक्स, डेवान प्रिटोरियस, रासी वान डुसेन, एच. कालसेन, डेविड मिलर, ट्रस्टिन स्टब्स, कगिसो रबाडा, केशव महाराज (कर्णधार), एनरिक नॉर्त्जे, लुंगी एनगिडी 


टेम्बा बावुमा दुखापतग्रस्त - 
नियमित कर्णधार टेम्बा बावुमाला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागलेय. त्याजागी फिरकीपटू केशव महाराज संघाचं नेतृत्व करत आहे. पाच सामन्याच्या टी 20 मालिका सध्या 2-2 ने बरोबरीत आहे. बेंगळुरुमध्ये आज करो या मरोचा सामना आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. राजकोट येथे झालेल्या चौथ्या सामन्यात टेम्बा बावुमाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फलंदाजी करताना रिटायर झाला होता. त्याची प्रकृती अद्याप ठीक नसल्यामुळे संघाचे नेतृत्व केशव महाराजकडे सोपवण्यात आलेय. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी -
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला. 









भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड -
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.