Team India Squad For Asia Cup 2025 : व्हाईट बॉल क्रिकेटमधील प्रत्येक कसोटीवर उतरणारा फलंदाज म्हणजे श्रेयस अय्यर. चॅम्पियन्स ट्रॉफीत फलंदाज म्हणून आणि आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या भूमिकेत त्याने चांगली कामगिरी केली. पण मोठा प्रश्न असा की, एवढं सगळं करूनही आशिया कपसाठी त्याची निवड होईल का? आणि झाली तर बाहेर कोण होणार शुभमन गिल की तिलक वर्मा?

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे, तर फलंदाज म्हणूनही शानदार कामगिरी केली. पंजाब किंग्जसाठी त्याने काही अप्रतिम खेळी खेळल्या आणि संघाला फायनलपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. फक्त आयपीएल नाही, तर त्याआधी दुबईत झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याने तुफानी फलंदाजी केली.  

स्पिनविरुद्ध अय्यरची ताकद

श्रेयसच्या बाजूने सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्याची स्पिनविरुद्ध रन करण्याची क्षमता. दुबईतील पिच स्पिनरसाठी मदतनीस असण्याची शक्यता आहे आणि सध्याच्या भारतीय फलंदाजांना टर्निंग चेंडूंसमोर त्रास होताना दिसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत हे स्पष्ट झाले. श्रेयस मात्र स्पिन ओळखण्यात आणि त्यावर आक्रमण करण्यात पटाईत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्यांनी याचा पुरेपूर पुरावा दिला आणि त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले.

शुभमन गिल की श्रेयस अय्यर?

गेल्या वर्षभरात भारताची टी-20 टीम स्थिर होती, पण आता आशिया कपसाठी अनेक दावेदार पुढे आले आहेत. श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर खेळले तर सूर्यकुमार कुठे खेळणार? गिल आला तर अभिषेक किंवा संजू सॅमसनपैकी कोणाला बाहेर बसवावे लागेल? आणि जर श्रेयस पाचव्या क्रमांकावर खेळला, तर तिलक वर्माचे काय? गिल, श्रेयस आणि तिलक हे तिघेही एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवणं कठीण आहे, विशेषत: जर सूर्या, अभिषेक आणि सॅमसनही असतील तर. गिल हा भारताचा लाल चेंडूतील कर्णधार असून भविष्यात सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार होऊ शकतो, पण श्रेयस अनुभवी असून निवड झाली तर पहिल्या अकरात स्थान मिळवण्याची त्याची पात्रता आहे.

सेलेक्शनमधला ‘शूट-ऑफ’

सध्या परिस्थिती पाहता, श्रेयस, गिल आणि तिलक यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. तिघांपैकी जास्तीत जास्त दोन जणच अंतिम संघात खेळू शकतील. 10 सप्टेंबरला जेव्हा भारत मैदानात उतरेल, तेव्हा खरी कसोटी असेल की प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळते. श्रेयससाठी हा छोट्या फॉरमॅटमध्ये स्वतःला नव्याने सिद्ध करण्याचा उत्तम चान्स आहे. पंजाब किंग्जसाठी जसा त्याने स्वतःला नव्याने घडवलं, तसं भारतासाठीही करता येऊ शकतं. त्याला दाबाच्या परिस्थितीची सवय आहे आणि पाकिस्तानविरुद्धचा सामना शेवटी यावरच ठरेल की कोण दबाव चांगला झेलतो. श्रेयसकडे तो मानसिक बळ आहे, त्यामुळे तो भारतासाठी विश्वासार्ह खेळाडू ठरू शकतो.

आशिया कप 2025 साठी 'ही' असू शकते टीम इंडिया : सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, शुभमन गिल/श्रेयस अय्यर/तिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल.

हे ही वाचा -

Team India : गिल, जैस्वाल ते श्रेयस अय्यर संघाबाहेरच? आशिया कपसाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11, कुणाला संधी?