BCCI announced India A squad for one-day series against Australia : भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (BCCI) ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताच्या ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यापासून तिलक वर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. सध्या इंडिया ‘अ’ संघ लखनऊ येथे ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामने खेळत आहे. वनडे मालिकेला 30 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरुवात होईल, तर 3 आणि 5 ऑक्टोबर रोजी दुसरा व तिसरा सामना याच मैदानावर रंगणार आहे.

Continues below advertisement

श्रेयस अय्यर अनधिकृत कसोटी मालिकेतही कर्णधार होता, मात्र त्याने लाल चेंडूपासून (Red-Ball Cricket) थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिने तो केवळ मर्यादित षटकांच्या (लिमिटेड ओव्हर्स) क्रिकेटमध्ये दिसणार आहे, अशी पुष्टी बीसीसीआयने केली आहे.

श्रेयस अय्यरने रेड-बॉल क्रिकेटपासून ब्रेक का घेतला?

Continues below advertisement

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने बीसीसीआयला कळवले आहे की, तो पुढील सहा महिने कसोटी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. इंग्लंडमध्ये त्याच्यावर पाठीची शस्त्रक्रिया झाली होती आणि तो सावरला देखील होता, पण दीर्घ फॉर्मेट खेळताना त्याला पुन्हा एकदा स्नायूंचा त्रास जाणवला. म्हणूनच तो हा काळ स्वतःची फिटनेस, सहनशक्ती आणि शारीरिक ताकद सुधारण्यासाठी वापरणार आहे. याच कारणामुळे त्याचा इराणी कपसाठी विचार करण्यात आला नाही.

श्रेयस अय्यर कर्णधार, तिलक वर्मा उपकर्णधार 

अय्यरच्या नेतृत्वाखालील इंडिया ‘अ’ संघात पहिल्या सामन्यासाठी रियान पराग, आयुष बडोनी, रवि बिश्नोई आणि प्रियांश आर्या यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यापासून तिलक वर्मा व अभिषेक शर्मा संघात परतणार आहेत, तर वेगवान गोलंदाज हर्षित राणा देखील जोडला जाणार आहे. तिलक वर्मा अंतिम दोन सामन्यांत उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळेल.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युधवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, सिमरजीत सिंग.

ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी भारत अ संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रियान पराग, आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, निशांत सिंधू, गुर्जपनीत सिंग, युद्धवीर सिंग, रवी बिश्नोई, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), हर्षित राणा, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा -

Ind vs Pak Asia Cup 2025 : हारिस अन् साहिबजादावर बीसीसीआयने अ‍ॅक्शन घेताच पाकिस्तान चवताळला; म्हणाला, तो सूर्यकुमार यादव...