Shoaib Akhtar On Mohsin Naqvi Ind vs Pak T20 World Cup 2026: अज्ञानी, अयोग्य, उद्ध्वस्त...शोएब अख्तर मोहसीन नक्वीला कधीही न वापरलेले शब्द बोलून गेला!
Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानचा पराभव होताच शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2026) भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी (India vs Pakistan) पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र पाकिस्तानचा संघ केवळ 114 धावांवर सर्वबाद झाला. भारतविरुद्धच्या या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला, आता असा एक व्यक्ती आहे ज्याला हे देखील माहित नाही की तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही अयोग्य आणि अज्ञानी व्यक्तीला नोकरी देता तेव्हा तो तुमचा देश उद्ध्वस्त करतो. तो कोणत्याही संघटनेला पाडू शकतो. याचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. तुम्ही हे समजून घेण्याइतके हुशार आहात, असं शोएब अख्तरने सांगितले. जेव्हा तुम्ही अशा लोकांना स्टार बनवता, तेव्हा तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागतो, असंही शोएब अख्तर एबीपी न्यूजसोबत बोलताना म्हणाला. (Shoaib Akhtar On Mohsin Naqvi)
#BREAKING | 'इंडिया की टीम वर्ल्ड कप जीतने ही आई है' - शोएब अख्तर@romanaisarkhan | @MohammadKaif https://t.co/smwhXUROiK#ABPNews #T20WorldCup2026 #IndVsPak #IshanKishan #MohammadKaif pic.twitter.com/MWKhccwtzK
— ABP News (@ABPNews) February 15, 2026
शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीलाही सुनावले- (Shoaib Akhtar On Ind vs Pak T20 World Cup 2026)
तुम्ही भारतीय असो किंवा पाकिस्तानी, तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. जर कोणता संघ त्यांना रोखू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्याप्रमाणे पाकिस्तान सामन्यात कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीकडून 23 धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे, असं म्हणत शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीसह पाकिस्तानचा चांगलेच सुनावले. पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाही. भारत पुढील 100 वर्षांचे क्रिकेट खेळत आहे किंवा पुढील 50 वर्षांचे क्रिकेट आता खेळत आहे. पाकिस्तान खूप वाईट क्रिकेट खेळत आहे आणि जेव्हा या फॉरमॅटचा (टी-20 आंतरराष्ट्रीय) विचार केला जातो तेव्हा ते खूप मागे आहेत, हे वारंवार स्पष्ट होतंय, असं शोएब अख्तरने सांगितले.
सामना कसा राहिला? (India vs Pakistan T20 World Cup 2026)
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा खाते न उघडता बाद झाला, परंतु इशान किशनने तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही 32 धावा केल्या, तर रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करत भारताला 170 धावांच्या पुढे नेले. भारताच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना पाकिस्तानी फलंदाजांना करता आला नाही. पहिल्याच षटकात हार्दिक पंड्याने साहिबजादा फरहानला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी फलंदाजांना गुडघ्यावर बसवले. जसप्रीत बुमराहने एकाच षटकात सॅम अयुब आणि सलमान आगा यांना बाद करून पाकिस्तानला धक्का दिला. बाबर आझमने 5, उस्मान खानने 44 धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानी संघाची अवस्था इतकी वाईट होती की उस्मान आणि शाहीन वगळता इतर कोणताही फलंदाज 20 धावाही करू शकला नाही.
3️⃣/3️⃣ for #TeamIndia 💙
— BCCI (@BCCI) February 15, 2026
The #MenInBlue win by 6️⃣1️⃣ runs to qualify for Super 8! 💪
Scorecard ▶️ https://t.co/IgYYH0TeR9 #T20WorldCup pic.twitter.com/hFPqtYIERe





















