India vs Pakistan : पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रम समोर येताच रोहित शर्माने काय केलं?, VIDEO ने धुमाकूळ
India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

India vs Pakistan T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी (India beat Pakistan) दणदणीत विजय मिळवला. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यानंतर मात्र भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन (NO Handshake) केले नाही. आशिया कप 2025 पासून टीम इंडियाने स्वीकारलेली ही नो हँडशेक भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
रोहित-वसीमची गळाभेट (Rohit Sharma and Wasim Akram hugging)
सामन्यापूर्वी मात्र अगदी उलट चित्र पाहायला मिळाले. माजी भारतीय कर्णधार आणि टी-20 विश्वचषक 2026 चा ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा कोलंबो येथे उपस्थित होता. त्याने आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता आणि पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) सोबत ट्रॉफी मैदानात आणली. या वेळी रोहित आणि वसीम अक्रम यांची गळाभेट झाली, दोघांनी हसत-गप्पा मारल्या. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि चाहत्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या.
Legends Hugs, Kids don’t Shake Hands.. #INDvPAK #T20WorldCup pic.twitter.com/FmfZlF12yA
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) February 15, 2026
मग भारतीय संघाने हस्तांदोलन का टाळले? (India vs Pakistan T20 World Cup 2026)
रोहित शर्मा वसीम अक्रम यांना मिठी मारू शकतात, तर सध्याचा भारतीय संघ पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन का करू शकत नाही? हा प्रश्न क्रिकेटविश्वात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.
हर्षा भोगले यांची टिप्पणी (Harsha Bhogle on Ind vs Pak NO Handshake)
प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले Harsha Bhogle यांनी भारत-पाकिस्तान सामन्यांच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. ते म्हणाले, “पूर्वी भारत-पाकिस्तान सामने म्हणजे भावनांचा रोलरकोस्टर असायचा. प्रत्येक चेंडूसोबत आशा-निराशेचे चढ-उतार जाणवायचे. विजय केवळ स्कोअरबोर्डवर नसायचा, तो मनात घर करून राहायचा, पराभवही दीर्घकाळ टोचत राहायचा. पण आता तो गहिरा भावनिक स्पर्श कमी होत चालला आहे.”
भोगले यांनी पुढे सांगितले की, क्रिकेट हळूहळू मोठ्या राजकीय अजेंड्याचा भाग बनत आहे. भू-राजकीय प्रश्नांना खेळापेक्षा जास्त महत्त्व मिळू लागले आहे. सामन्याभोवती राष्ट्रवाद आणि राजकीय संदेशांचे वातावरण तयार होते, तर खेळाडू केवळ त्या मोठ्या चित्रातील एक भाग बनून राहतात.
संजय मांजरेकर यांची टीका
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही ‘नो हँडशेक’ धोरणावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “ही ‘नो हँडशेक’ गोष्ट भारताने सुरू केलेली अनावश्यक बाब आहे. आपल्या देशाला हे शोभत नाही. खेळभावनेने खेळायचे असेल तर नीट खेळा, अन्यथा खेळूच नका.”
हे ही वाचा -




















