Rohit Sharma News : रोहित शर्मा जेव्हा क्रीजवर उतरतो, तेव्हा समोरच्या गोलंदाजांची अक्षरशः धडकी भरते आणि विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. आधी सिक्कीमविरुद्ध खेळताना रोहितने अवघ्या 27 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं, तर फक्त 62 चेंडूत शतक ठोकले. त्याने आठ षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रोहित शर्माने 7 वर्षांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आहे. तो 7 वर्षांनी या स्पर्धेत खेळत आहे.

Continues below advertisement

रोहित शर्माचा धमाका

Continues below advertisement

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रोहित शर्मा फलंदाजीसाठी उतरला आणि क्षणातच वातावरण बदललं. हा सामना पाहण्यासाठी 12 हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये जमले होते, आणि रोहितने आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांची निराशा होऊ दिली नाही. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला रोहितने स्फोटक सुरुवात करून दिली. अंगकृष रघुवंशीसोबत त्याने डाव वेगाने पुढे नेला. रोहितने आधी षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर 62 चेंडूत शतक ठोकले. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 8 षटकार मारले.

वनडे मालिकेची तयारी 

जगातील नंबर -1 वनडे फलंदाज रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीत खेळून न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेची तयारी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीतील किमान दोन सामने खेळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच रोहित या स्पर्धेत सहभागी झाला आहे. रोहितसाठीही ही संधी महत्त्वाची आहे, कारण या माध्यमातून त्याला उत्तम मॅच प्रॅक्टिस मिळत आहे आणि तो पुन्हा एकदा लयीत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

हे ही वाचा - 

Ishan Kishan News : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होताच ईशान किशनचा धमाका! 33 चेंडूत ठोकलं शतक, काही तासात वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड उद्ध्वस्थ