Ind vs Pak Video : तो पाकिस्तानसाठी आला, पण वारं फिरलं की तोही बदलला, कॅमेऱ्यासमोरच घातली टीम इंडियाची जर्सी; भारत-पाकिस्तान मॅचमधील व्हिडीओची तुफान चर्चा!
आयपीएलमध्ये तुम्ही अनेकदा चाहत्यांना सामन्यादरम्यान जर्सी बदलताना पाहिले असेल.

Pakistani Fan Switches To India's Jersey Video : आयपीएलमध्ये तुम्ही अनेकदा चाहत्यांना सामन्यादरम्यान जर्सी बदलताना पाहिले असेल, पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी (23 फेब्रुवारी) झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी चाहता त्याच्या देशाच्या जर्सीपेक्षा टीम इंडियाची जर्सी घालताना दिसत आहे.
सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानी चाहत्याने त्याची जर्सी बदलली. खरं तर,सुरुवातीपासूनच या सामन्यात टीम इंडियाची पकड होती. टीम इंडियाने पाकिस्तानच्या पहिल्या दोन विकेट 50 धावांच्या आत घेतल्या. यानंतर, कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी शतकी भागीदारी करून पाकिस्तान संघाला अडचणीतून बाहेर काढले, परंतु कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतताच पाकिस्तान संघ लवकर ऑलआऊट झाला.
एकेकाळी 151 धावांत फक्त 2 विकेट गमावल्यानंतर चांगल्या स्थितीत दिसत असलेला पाकिस्तान पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि त्यांचा 241 धावांतच खेळ खल्लास झाला. पाकिस्तानच्या एकामागून एक विकेट पडत असताना, एका पाकिस्तानी चाहत्याने खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आपली जर्सी बदलली.
पाकिस्तानी के फैन को हम लोगों ने भारत जर्सी पहना दिया ! #INDvsPAKlive #INDvsPAK #ViratKohli𓃵 #virat pic.twitter.com/Mx1w0Ymhy7
— ANSHUL YADAV (@Anshulydv02) February 24, 2025
टीम इंडियाने 242 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले. रोहित शर्मा (20) कदाचित लवकर बाद झाला असेल पण त्यानंतर शुभमन गिल (46), श्रेयस अय्यर (56) आणि विराट कोहली यांनी शानदार खेळी करत भारताला आरामात विजय मिळवून दिला. जेव्हा टीम इंडियाला जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता होती, तेव्हा विराटला त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी 4 धावांची आवश्यकता होती, अशा परिस्थितीत कोहलीने चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि त्याचे शतकही पूर्ण केले. टीम इंडियाने 45 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होऊन फक्त 5 दिवस झाले आहेत आणि यजमान संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आणि आता त्यांना भारताकडून सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.या विजयासह, टीम इंडिया ग्रुप-अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर चार संघांच्या या टेबलमध्ये पाकिस्तान शेवटच्या स्थानावर आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात ग्रुप-अ चा सामना होणार आहे. जर किवी संघ जिंकला तर भारत आणि न्यूझीलंड संघांना या ग्रुपमधून सेमीफायनलचे तिकीट मिळेल.
हे ही वाचा -




















