India vs Pakistan Live Streaming Hong Kong Sixes 2025 : भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात भिडणार आहे. पण यावेळी माजी दिग्गज खेळाडू आमनेसामने येणार आहेत. हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत शुक्रवार 7 नोव्हेंबरला भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या स्पर्धेचा फायनल सामना 9 नोव्हेंबरला खेळला जाईल. तीन दिवसांत एकूण 29 सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात (ग्रुप C) ठेवण्यात आले आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Continues below advertisement

स्पर्धेत एकूण 12 संघ

हाँगकाँग सिक्सेसमध्ये 12 संघ सहभागी झाले असून, त्यांना प्रत्येकी तीन-तीन संघांच्या चार गटात विभागण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 1990 साली झाली होती. प्रत्येक सामना 6 षटकांचा असतो. यंदाचे सामने टिन क्लेंग रोड रिक्रिएशन ग्राउंड येथे खेळले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तानसह कुवेत हाही संघ ग्रुप C मध्ये आहे.

Continues below advertisement

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि किती वाजता? (IND vs PAK Live Hong Kong Sixes 2025)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 7 नोव्हेंबरला दुपारी 1:05 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. टीम इंडिया आपला पुढील सामना 8 नोव्हेंबरला सकाळी 6:40 वाजता कुवेतविरुद्ध खेळेल. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांना क्वार्टर फायनल फेरीत प्रवेश मिळेल, त्यानंतर नॉकआउट फेरी सुरू होईल.

हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत गट

पूल A : दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, नेपाळपूल B : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, यूएईपूल C : भारत, पाकिस्तान, कुवैतपूल D : श्रीलंका, बांग्लादेश, हॉंगकॉंग

भारतीय संघ (Team india Squad For Hong Kong Sixes 2025)

भारतीय संघाचे नेतृत्व माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक करणार आहे. त्याच्यासोबत स्टुअर्ट बिन्नी, रॉबिन उथप्पा, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाल आणि भरत चिपली हे खेळाडू संघात समाविष्ट आहेत.

सामने कुठे पाहता येतील? (Live Streaming Hong Kong Sixes 2025)

भारतामध्ये हाँगकाँग सिक्सेस 2025 चे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. ऑनलाइन स्ट्रिमिंगसाठी SonyLIV आणि FanCode अ‍ॅपवर सामने पाहता येतील. याशिवाय Cricket Hong Kongच्या YouTube चॅनलवरही लाईव्ह प्रसारण उपलब्ध असेल.

स्पर्धेचा फॉर्मेट

प्रत्येक संघात 6 खेळाडू असतील आणि प्रत्येक संघाला 6 षटके फलंदाजीसाठी मिळतील. म्हणजेच एकूण सामना 12 षटकांचा असेल. 5 खेळाडू गोलंदाजी करू शकतात, परंतु यष्टिरक्षकाला गोलंदाजीची परवानगी नाही. त्यापैकी 4 खेळाडू प्रत्येकी 1 ओव्हर टाकतील आणि 1 खेळाडू 2 ओव्हर टाकेल (पण सलग नाही). जर एखादा फलंदाज 50 धावा पूर्ण करेल, तर त्याला ‘नॉट आऊट’ अवस्थेत रिटायर व्हावे लागेल. तो पुन्हा फक्त तेव्हाच फलंदाजीस येऊ शकतो, जेव्हा इतर फलंदाज बाद होतील.

शेवटचा फलंदाज नियम

जर संघाचे 5 फलंदाज बाद झाले, तरी शेवटचा फलंदाज एकट्याने फलंदाजी करू शकतो. त्याच्यासोबत शेवटचा बाद झालेला खेळाडू फक्त रनर म्हणून धावेल. शेवटचा फलंदाज नेहमी स्ट्राइकवर राहील. जर त्याचा रनर बाद झाला, तर तोही बाद मानला जाईल आणि संघाची डाव समाप्त मानली जाईल.

हे ही वाचा -

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड कपविजेत्या हरमनप्रीत कौरबाबत मोठा निर्णय, WPL साठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर