India vs Netherlands : 13 षटकार, 11 चौकार अन् फलकावर 193 धावा! शिवम दुबेची धमाकेदार फलंदाजी, हार्दिक पांड्याही चमकला, नेदरलँड्सला धू-धू धुतले
India vs Netherlands T20 World Cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचा मजबूत टप्पा गाठला.

India vs Netherlands T20 World Cup 2026 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 193 धावांचा मजबूत टप्पा गाठला. नाणेफेक जिंकून कर्णधाराने आधी बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र अपेक्षेपेक्षा वेगळे चित्र पाहायला मिळाले. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा करत भारतीय फलंदाजांना सहज खेळ करू दिला नाही. विशेषतः आर्यन दत्तने प्रभावी गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले.
Innings Break!
— BCCI (@BCCI) February 18, 2026
A high-flying partnership between Shivam Dube and Hardik Pandya powers #TeamIndia to 1⃣9⃣3⃣/6 🫡
Onto our bowling now! ⌛
Scorecard ▶️ https://t.co/SdXngdnwKB#T20WorldCup | #MenInBlue | #INDvNED️ pic.twitter.com/CCOhBmMiYp
भारताची धक्कादायक सुरुवात...
भारताची सुरुवात मात्र धक्कादायक ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. या विश्वचषकात तिसऱ्यांदा तो खाते न उघडताच परतला. ईशान किशनने झटपट सुरुवात केली, पण केवळ 7 चेंडूत 18 धावा करून तोही माघारी परतला. तिलक वर्माने संयमी खेळ करत 31 धावांचे योगदान दिले, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने मधल्या षटकांमध्ये डाव सावरत 34 धावा केल्या. मात्र खऱ्या अर्थाने शिवम दुबेने डावाला वेग दिला. त्याने झंझावाती अर्धशतक ठोकत भारताला 193 धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.
शिवम दुबे नावाचं वादळ...
शिवम दुबे नवव्या षटकात फलंदाजीला आला, तेव्हा त्याची सुरुवात अतिशय संथ झाली होती. पहिल्या 11 चेंडूमध्ये त्याने फक्त 6 धावा केल्या. मात्र त्यानंतर त्याने गिअर बदलला आणि पुढील 14 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा ठोकत सामना भारताच्या बाजूने फिरवला. केवळ 25 चेंडूमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले, टी-20 वर्ल्ड कपमधील त्याची ही पहिलीच अर्धशतकी खेळी ठरली. दुबेने 31 चेंडूत 66 धावांची झंझावाती खेळी साकारली, ज्यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
हार्दिक पांड्याची साथ
हार्दिक पांड्या यानेही दुबेला साथ दिली. हार्दिकने 21 चेंडूत 30 धावा करत आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या 11 षटकांत भारताने केवळ 76 धावा केल्या होत्या. पण शेवटच्या 9 षटकांत भारतीय फलंदाजांनी तब्बल 117 धावा काढत सामन्याचा चेहरामोहरा बदलला. दुबे आणि हार्दिक यांच्यातील 76 धावांची भागीदारी हा या झंझावाती पुनरागमनाचा मुख्य आधार ठरला. अखेरच्या 9 चेंडूमध्ये भारताने 4 षटकार मारले, जरी त्याच वेळी 2 गडी बाद झाले. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीक सर्वाधिक प्रभावी ठरला. त्याने 3 विकेट्स घेत भारतीय फलंदाजांना काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला. आर्यन दत्त याने 2 बळी घेतले, तर काइल क्लेन यानेही 1 विकेट आपल्या नावावर जमा केली.
हे ही वाचा -





















