एक्स्प्लोर

IND vs SA Women's T20 World Cup 2026 : जिंकलेली बाजी हरली! टीम इंडियाच्या 'त्या' एका चुकीमुळे कॅपने फिरवला अख्खा गेम; महिला विश्वचषकात भारताचा पहिला पराभव

South Africa vs India ICC Women's T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्डकप 2026 मधील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला.

South Africa vs India ICC Women's T20 World Cup 2026 : महिला टी-20 वर्ल्डकप 2026 मधील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने मारिजाने कॅपच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. भारताचा या विश्वचषकातील हा पहिलाच पराभव आहे.

भारताची संथ फलंदाजी; एकही अर्धशतक नाही

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचा निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही. उपकर्णधार स्मृती मानधना (17 धावा) आणि फॉर्मात असलेली शेफाली वर्मा (31 धावा) पॉवरप्लेमध्येच बाद झाल्या. यानंतर भारतीय डावाला गती देता आली नाही. यास्तिका भाटिया (15) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (12) स्वस्तात परतल्या. आपला 200 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 24 धावा केल्या, तर दीप्ती शर्माने 29 धावांचे योगदान दिले. भारताचा एकही फलंदाज अर्धशतक झळकावू शकला नाही आणि संघाने निर्धारित 20 षटकांत 158 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माईल आणि मारिजाने कॅपने प्रत्येकी 2 बळी घेतले.

श्री चराणीचे दुहेरी धक्के आणि भारताचे पुनरागमन

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर लॉरा वोल्वार्ड आणि ताझमीन ब्रिट्स यांनी संथ सुरुवात केली होती. मात्र, पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात भारताच्या श्री चराणीने अप्रतिम गोलंदाजी करत एकाच षटकात कर्णधार वोल्वार्ड (20) आणि एनेरी डर्कसेन (0) यांना बाद करून भारताला सामन्यात परत आणले.

कॅप-ब्रिट्सची भागीदारी आणि भारताचे खराब क्षेत्ररक्षण

दोन गडी लवकर गमावल्यानंतर मारिजाने कॅप आणि ताझमीन ब्रिट्स यांनी तिसऱ्या गड्यासाठी 97 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. भारताने या दरम्यान सुमार क्षेत्ररक्षण केले आणि सोपे झेल सोडले. 17 व्या षटकात शेफाली वर्माने ब्रिट्सला (40 धावा) बाद करून ही जोडी फोडली. परंतु, याच षटकात राधा यादवने मारिजाने कॅपचा एक अत्यंत सोपा झेल सोडला, जो भारताला महागात पडला.

मारिजाने कॅपची मॅच-विनिंग खेळी

दोन जीवनदान मिळालेल्या मारिजाने कॅपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. तिने अवघ्या 45 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 81 धावांची मॅच-विनिंग खेळी केली. ही तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. तिच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. भारताकडून श्री चराणीने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर दीप्ती शर्मा (44 धावा) आणि प्रेमा रावत (21 धावा) खूप महागड्या ठरल्या. खराब क्षेत्ररक्षण आणि मोक्याच्या क्षणी सुटलेले झेल यामुळे भारताला या हक्काच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

हे ही वाचा -

Sri Lanka A vs India A, Final: भारत 'अ' संघाने श्रीलंका 'अ' संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
तू 2027 च्या विश्वचषक स्पर्धेच्या नियोजनाचा भाग नाही, निवड समितीचा रोहितला मेसेज; आता 3 कारणं आली समोर
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
रोहित शर्मा 19 जुलैला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार; वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget