Ind vs Wi 2nd Test : एक-दोन-तीन... पोरीने कानाखाली मारल्या, Ind vs WI च्या लाईव्ह सामन्यात मैदानात काय घडलं?, VIDEO
चौथ्या दिवशी अरुण जेटली स्टेडियमवर घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

India vs West Indies 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जात आहे. चौथ्या दिवशी अरुण जेटली स्टेडियमवर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्टँडमध्ये बसलेल्या एका मुलाला एकदा नाही तर तब्बल तीन-चार वेळा कानाखाली मारताना दिसत आहे. आजूबाजूचे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले, तर काहींनी हा प्रसंग मोबाईलमध्ये टिपला. ही घटना वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावातील 89व्या षटकानंतर घडली. पण त्यांची मस्ती चालू होती. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
Bruhhh ......😄😂
— chakr (@chkrdhr_) October 13, 2025
What he might have said ? #INDvsWI pic.twitter.com/73rIxdPAbw
दुसरीकडे सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, वेस्टइंडिज क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त पुनरागमन केले. पहिल्या डावात खराब कामगिरी केल्यानंतर वेस्टइंडिजने दुसऱ्या डावात अशी झुंज दिली की टीम इंडियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. सामना कोण जिंकेल हे अजून सांगता येणार नाही, पण वेस्टइंडिजने ते करून दाखवले आहे जे त्यांनी गेल्या 12 वर्षांत कसोटीत केले नव्हते.
कसोटीत जेव्हा एखाद्या संघाला फॉलोऑनचा सामना करावा लागतो, तेव्हा बहुतांश वेळा तो सामना डावाने हरावा लागतो. सलग दोनदा फलंदाजी करणे सोपे नसते. वेस्टइंडिजलाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. शेवटचं असं 2013 साली झालं होतं, जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध फॉलोऑन मिळाल्यानंतर त्यांनी सामना डावाने न हरता ड्रॉ केला होता. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी असा दिवस पाहिला आहे.
जॉन कॅम्पबेल आणि शाई होपचा धमाका
भारतीय संघाने पहिल्या डावात 5 गडी गमावून 518 धावा करत डाव घोषित केला. त्यानंतर वेस्टइंडिजची पहिली खेळी 248 धावांवर संपली. कर्णधार शुभमन गिलने पुन्हा फलंदाजी न करता वेस्टइंडिजला फॉलोऑन दिला. जरी दोन गडी लवकर गमावले गेले असले तरी जॉन कॅम्पबेल आणि शाई होपने पुनरागमन केले. कॅम्पबेलने आपले पहिले कसोटी शतक झळकावले, तर शाई होपने कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले.
दुसऱ्या डावात वेस्टइंडिजने 270 धावा गाठताच त्यांनी भारताचा स्कोर बरोबरीत आणला. आणखी एक धाव मिळताच वेस्टइंडिजने आघाडी घेतली आणि याच क्षणापासून निश्चित झालं की ते आता हा सामना डावाने हरणार नाहीत. तरीही सामना अजून पूर्ण व्हायचा आहे, आणि अखेरचा दिवस बाकी असल्याने काहीही घडू शकतं.
हे ही वाचा -
















