एक्स्प्लोर

IND vs PAK Weather Report : हायव्होल्टेज ड्रामा, पाऊस ठरतोय व्हिलन; सामना रद्द झाला तर पाकिस्तानची चांदी, टीम इंडिया OUT?, पाहा पॉइंट्स टेबलचं गणित

IND vs PAK T20 World Cup 2026 Update Marathi News : रविवार 15 फेब्रुवारी रोजी ग्रुप-ए मधील भारत–पाकिस्तान सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

IND vs PAK R Premadasa Stadium Weather Updates : टी-20 विश्वचषक 2026 च्या सामन्याभोवतीचा उत्साह कदाचित अलिकडच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील इतर कोणत्याही सामन्यापेक्षा जास्त असेल. याचे एक कारण म्हणजे अलिकडचा वाद, जिथे पाकिस्तानने काही दिवसांसाठी या सामन्यावर बहिष्कार टाकला होता, परंतु नंतर यू-टर्न घेतला आणि खेळण्यास सहमती दर्शविली. शिवाय, आशिया कप 2025 दरम्यान निर्माण झालेल्या गोंधळामुळे, यावेळी वातावरण तितकेच तापलेले राहील का याबद्दल उत्सुकता वाढत आहे. मात्र या साऱ्या उत्सुकतेवर पावसाचे सावट दाटले आहे. कोलंबोमध्ये त्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून हवामान खात्याने सतर्कतेचा इशाराही दिला आहे.

सामन्याच्या संध्याकाळी पावसाची शक्यता (IND vs PAK match likely to rain)

रविवार 15 फेब्रुवारी रोजी ग्रुप-ए मधील भारत–पाकिस्तान सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पण श्रीलंकेच्या हवामान विभागाने दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारी निवेदनात थेट पावसाचा उल्लेख नसला तरी विविध हवामान संकेतस्थळांनुसार संध्याकाळी 6 ते 8 वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. जर पाऊस झाला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो रद्द करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल.
सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा?

IND vs PAK सामना रद्द झाल्यास कोणाला फायदा? (Who benefits if the IND vs PAK match is cancelled?)

सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे 4-4 गुण आहेत. सामना रद्द झाल्यास दोघांचे 5-5 गुण होतील आणि दोन्ही संघ सुपर-8 फेरीसाठी पात्र ठरतील. या दृष्टीने पाहता, सामना रद्द होणे दोघांसाठीही फायदेशीर ठरेल.

पण याचा सर्वात मोठा तोटा अमेरिका आणि नेदरलँड्सला होईल. या दोन्ही संघांचे सध्या 2-2 गुण आहेत आणि प्रत्येकी एक सामना बाकी आहे. त्यांनी तो जिंकला तरी त्यांचे गुण 4 होतील, जे भारत-पाकिस्तानच्या संभाव्य 5 गुणांपेक्षा कमी असतील. त्यामुळे त्यांची सुपर-8मध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात येईल.

सामना झाला तर समीकरण काय? (What is the IND vs PAK match equation?)

जर सामना झाला आणि निकाल लागला, तर विजेता संघ थेट पुढील फेरीत जाईल. पराभूत संघाला मात्र अमेरिका आणि नेदरलँड्सच्या निकालांवर लक्ष ठेवावे लागेल. नेदरलँड्सचा शेवटचा सामना भारताविरुद्ध आहे, त्यामुळे त्यांची वाट कठीण दिसते. अमेरिका मात्र नामिबियाविरुद्ध खेळणार आहे, आणि नामिबिया अजून एकही सामना जिंकलेली नाही.

जर भारताने पाकिस्तानला हरवले आणि नंतर एखाद्या उलटफेरीत नामिबियाने पाकिस्तानला पराभूत केले, तर अमेरिकेला पुढे जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. विशेषतः जर त्यांनी आपला शेवटचा सामना जिंकला. 

हे ही वाचा -

T20 World Cup Points Table 2026 : मोठी उलथापालथ! छोट्या संघांची सरशी, बड्या संघांची मस्ती जिरली; पॉइंट्स टेबल बघून सगळेच चक्रावले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
ICC : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तान आणि झिम्बाब्वेला किती रक्कम मिळाली?
ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकिस्तानला किती?
IPL 2026 Schedule : मोठी बातमी, आयपीएलचं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
IPL चं पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध कोण लढणार? मुंबईचा पहिला सामना कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget