आशिया चषक 2025 भारताने उंचावत पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील अंतिम सामना अत्यंत रोमहर्षक झाला असून भारतीय संघाने आशिया चषकातील तीनही सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. अगदी पहिल्या सामन्यापासून पाकिस्तानविरुद्ध खेळताना वेगळाच दबाव टीमइंडियावर होता. कर्णधार सूर्यकुमारयादवनेहातमिळवणी न करता पाकिस्तानला (Pakistan) दिलेल्या चोख उत्तरापासून ते हारीसरौफने केलेल्या एअरस्ट्राईकच्यास्टंटबाजीमुळेयंदाच्या सामन्यात वेगळाच जोशटीम इंडियात दिसून आला. अंतिम सामन्यात तिलक वर्माने (Tilak varma) शानदार फटकेबाजी करत पाकिस्तानच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. मैदानावरील त्यावेळची स्थिती आणि त्याची मन की बात आता तिलक वर्माने सांगितली आहे.

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज तिलक वर्माने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलताना मन की बात सांगितली. आशिया चषकातील अंतिम सामन्यात कुठल्याही परिस्थितीत जिंकण महत्त्वाचं होतं, जिंकण्यासाठी काहीही करायची तयारी होती, त्यामुळे दबावाला न जुमानता आपण लढल्याचे तिलक वर्माने हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले.

''सूर्याभाईनेम्हटलं की पाकिस्तानसोबत कुठलीही स्पर्धा नाही, मीही त्या गोष्टीचं समर्थन करतोय. प्रत्येक सामन्यात वेगळी रणनीती आखली जात असते, नवी योजना ठरत असते. मैदानात खेळताना दबाव तर असतोच, अंतिम सामन्यात मी फलंदाजी करताना डोक्यात अनेक विचार होते. आपला देश सर्वात आधी आहे, भारत सर्वात पुढे आहे, त्यामुळे देशासाठी आज जीव पण देईन, असेच त्यावेळीमाझ्या मनात होते, असे तिलक वर्माने पत्रकारांशी बोलताना सांगितले. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात अटीतटीची लढाई सुरू असताना, भारतावर पाकिस्तानी गोलंदाजांचा दबाव वाढला असताना आपण शांत राहून खेळ केल्याचं'' तिलक वर्माने सांगितले. जेव्हा तीन विकेट पडल्या होत्या, तेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानात उतरलो होतो, मात्र पाकिस्तान खेळाडू माझ्यावर आक्रमण करत होते. पण, मी शांत राहून गेम केला, आणि मॅच जिंकल्यानंतर चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं, असेही तिलक वर्मानम्हटलं.

तिलकशर्मास्ट्राईकरेटवरआघाडीवर

दरम्यान, तिलकवर्मानेअंतिमसामन्यातपाकिस्तानविरुद्धधडाकेबाजखेळीकरत 69 धावाकेल्या. यासामन्यातभारतालाविजयासाठी 147 धावांचीगरजहोती, त्यापैकीजवळपासअर्ध्याम्हणजेच 69 धावाकरतटीमइंडियाच्याविजयाचा तिलक त्यानेच लावला. तिलक वर्माची टी-20 सामन्यातील सरासरी 53.4 असून विराट कोहलीची 50.7 आहे. सध्या 30 डावानंतर तिलक शर्मा स्ट्राईकरेटमध्ये आघाडीवर आला आहे.

हेही वाचा

आम्हाला वाटतंच होतं, पाकिस्तान काहीतरी करेल, सूर्यकुमार यादवने सांगितली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील इनसाईड चर्चा