Ind vs Nz Final : वर्ल्डकप जिंकला रे... नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडला, भारताने किवींना हरवत पुन्हा विश्वचषक उंचावला
India vs New Zealand Final Update In Marathi : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला.

पार्श्वभूमी
India vs New Zealand Final Update In Marathi : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे आज 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात...More
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून भारताने विजेतेपद पटकावले.
भारताच्या 255 धावांच्या प्रत्युत्तर न्यूझीलंडचा संघ 19 षटकांत 159 धावांवर गारद झाला.
जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर टीम इंडियाला यश मिळवून दिले.
अंतिम फेरीत त्याने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
रचिनला एक धाव करता आली. याआधी अक्षरने फिन ॲलनला बाद केले होते.
त्याला नऊ धावा करता आल्या.
चार षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा आहे.
तिसऱ्या षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला.
अक्षर पटेलने फिन ऍलनला आऊट केले. पहिल्याच षटकात ॲलनला एक धावसंख्या असताना जीवदान मिळाले. आता तो नऊ धावा करून बाद झाला.
अक्षरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ॲलन लाँग ऑनला झेलबाद झाला.
हार्दिक पांड्याने दुसरे षटक टाकले.
या षटकात न्यूझीलंडने 21 धावा ठोकल्या.
2 षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या एकही विकेट न पडता 25 धावा आहे.
टीम सेफर्ट आठ चेंडूत 20 धावांवर खेळत आहे.
फिल ऍलन 4 चेंडूत 4 धावांवर आहे.
भारताने न्यूझीलंडसमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
जेम्स नीशमने 16व्या षटकात सामन्याच चित्र पलटवून टाकले. भारत 250+ धावांच्या दिशेने वेगाने धावत असताना या एका षटकात तीन विकेट पडल्याने अचानक मोठा धक्का बसला.
16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर नीशमने संजू सॅमसनला आऊट केले. सॅमसनने 46 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 89 धावांची तुफानी खेळी केली.
त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर नीशमने ईशान किशनला चॅपमनकडे झेल देण्यास भाग पाडले. ईशानने 25 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 54 धावा केल्या.
आणि मग षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नीशमने सूर्यकुमार यादवला रचिनच्या हाती झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. कर्णधार सूर्यकुमार यादव खातेही उघडू शकले नाहीत.
16 षटकांनंतर भारताचा स्कोर 4 बाद 204 धावा असा आहे.
संजू सॅमसनचे पुन्हा शतक हुकले. त्याने पुन्हा 89 धावांची खेळी खेळली.
उपांत्य फेरीतही तो याच स्कोअरवर बाद झाला होता.
सॅमसनने या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. जेम्स नीशमने त्याला आऊट केले.
संजू सॅमसनने 14व्या षटकात सलग तीन षटकार ठोकले.
14 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 191 धावा आहे.
संजू सॅमसन 44 चेंडूत 88 धावांवर खेळत आहे. त्याने 5 चौकार आणि 8 षटकार मारले आहेत.
इशान किशन 19 चेंडूत 43 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
संजू सॅमसनने 33 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.
11 षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर 137 धावा आहे.
संजू सॅमसन 33 चेंडूत 50 धावांवर खेळत आहे. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत.
इशान किशन 12 चेंडूत 27 धावांवर खेळत आहे. त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
भारताला पहिला धक्का अभिषेक शर्माच्या रूपात बसला, जो आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
त्याने 21 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 52 धावा केल्या.
98 धावांवर टीम इंडियाला हा धक्का बसला.
ईशान किशन आता फलंदाजीसाठी आला आहे.
दुसऱ्या टोकाला संजू सॅमसन 22 चेंडूत 38 धावांवर फलंदाजी करत आहे.
पॉवरप्ले संपला आहे आणि सहा षटकांत भारताने बिनबाद 92 धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्मा सध्या 19 चेंडूत 51 धावांवर आणि संजू सॅमसन 17 चेंडूत 33 धावांवर फलंदाजी करत आहे.
पहिल्या दोन षटकांत 12 धावा दिल्यानंतर, शेवटच्या चार षटकांत 80 धावा झाल्या आहेत.
5 षटकांनंतर भारताने एकही बाद 72 धावा केल्या आहेत.
संजू सॅमसन 17 चेंडूत 33 धावांवर खेळत आहे, त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले आहेत.
अभिषेक शर्मा 13 चेंडूत 31 धावांवर खेळत आहे, त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
चौथ्या षटकात 24 धावा आल्या.
4 षटकांनंतर भारताचा स्कोअर विनाविकेट 51 आहे.
संजू सॅमसन 14 चेंडूत 24 धावांवर खेळत आहे.
अभिषेक शर्मा 10 चेंडूत 23 धावांवर खेळत आहे.
फायनलच्या मोठ्या मंचावर भारतीय सलामीवीरांनी आपल्या नावाचा धडाका लावला आहे.
सलामी जोडी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी मैदानावर येताच प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली आहे.
अवघ्या 3 षटकांत भारताने बिनबाद 27 धावा केल्या आहेत.
मॅट हेन्रीने पहिला षटक टाकला. या षटकातून फक्त 7 धावा आल्या.
तर, ग्लेन फिलिप्सने दुसऱ्या षटकात 5 धावा दिल्या.
मॅट हेन्रीच्या पहिल्या षटकात भारताने 7 धावा काढल्या.
संजू सॅमसनने षटकातील पाचव्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकत प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला.
एक षटक संपल्यानंतर टीम इंडियाचा स्कोअर 7 धावा झाला आहे.
भारताचा डाव सुरू झाला आहे.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा क्रीजवर आहेत.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.
टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्यास आनंदी असल्याचे सांगितले. भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल नाहीत.
किवींनी प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. जॅकब डफीने स्पिनर कोल मॅककॉन्चीची जागा घेतली.
भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारत कोणत्या प्लेइंग इलेव्हनला मैदानात उतरवेल हा प्रश्न आहे.
जागतिक क्रमवारीत नंबर 1 फलंदाज अभिषेक शर्मा आणि नंबर 1 गोलंदाज वरुण चक्रवर्ती प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील का? हा एक मोठा प्रश्न आहे.
अहवालांनुसार वरुण आणि अभिषेक दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.
टी-20 विश्वचषकात आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी निराशा केली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. अभिषेकने संपूर्ण स्पर्धेत फक्त एक अर्धशतक झळकावले आहे.
दरम्यान, वरुण चक्रवर्तीने सातत्याने खराब कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत त्याने चार षटकांत 64 धावा दिल्या.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होणार नाही. याचा अर्थ कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाणार नाही. टीम इंडियामध्ये तेच 11 खेळाडू असतील ज्यांनी संघाला अंतिम फेरीत नेले.
सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
टिम सेफर्ट, फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन.
अहमदाबादमध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत खेळवलेलीच टीम जवळपास कायम ठेवण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांत मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे.
पण, अहमदाबादच्या खेळपट्टीवर कुलदीप यादव प्रभावी ठरू शकतो. त्याने आतापर्यंत 54 टी-20 सामन्यांत 95 विकेट घेतल्या आहेत. येथे न्यूझीलंडविरुद्ध एक सामना खेळला होता, ज्यात भारताने 166 धावांनी विजय मिळवला होता. मात्र त्या सामन्यात कुलदीपने फक्त एक षटक टाकत 12 धावा दिल्या होत्या.
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा सलामीवीर आणि जगातील नंबर-1 टी-20 फलंदाज अभिषेक शर्माची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट जवळपास शांतच राहिली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये अभिषेक शर्मा फक्त 9 धावा करून बाद झाला. ऑफ-स्पिनर विल जॅक्सच्या चेंडूवर तो फिल सॉल्टच्या हाती मिडविकेटवर झेलबाद झाला. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने 55 धावांची खेळी केली होती, मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म पुन्हा घसरला. या वर्ल्ड कपमध्ये त्याने 7 डावांत केवळ 89 धावा केल्या असून त्याची सरासरी 12.71 इतकी खराब राहिली आहे.
या टी-20 विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काहीसा चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. अहमदाबादमध्ये भारताने दोन सामने खेळले असून त्यापैकी एकात विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 76 धावांनी पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडनेही येथे 14 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता. त्या सामन्यात कीवी संघाने 176 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 17.1 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज गाठले होते.
अंतिम सामन्यासाठी वापरली जाणारी पिच फलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुंबईप्रमाणेच येथेही धावांचा पाऊस पडू शकतो. फायनलसाठी सेंटर पिचचा वापर केला जाणार असून ती लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे पिचवर चांगला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे.
यामुळे वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, मात्र फिरकीपटूंना फारशी मदत मिळेल अशी शक्यता कमी आहे.
टीम इंडियाने या टी20 वर्ल्ड कप आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व चार सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर सुपर-8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला, मात्र पुढील दोन सामन्यांत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय मिळवला.
यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताने 7 विकेट गमावत 253 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तर इंग्लंडची टीम 246 धावांपर्यंत मजल मारू शकली.
खरं तर ,टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अभिषेक शर्मा टीम इंडियाचे मोठे शस्त्र मानले जात होते.
मात्र या स्पर्धेत त्याची बॅट अजूनही शांतच आहे. त्याने 7 सामन्यांत फक्त 14.16 च्या सरासरीने केवळ 89 धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या 55 धावा हीच त्याची एकमेव उल्लेखनीय खेळी ठरली आहे.
अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यांत तो खातेही उघडू शकला नाही. या स्पर्धेत त्याने अनुक्रमे 0, 0, 0, 15, 55, 10 आणि 9 अशा धावा केल्या आहेत.
वरुण चक्रवर्ती आता सर्व टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर होता. त्याने 2023 मध्ये गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0/68 धावा दिल्या होत्या. तसेच युजवेंद्र चहलच्या नावावरही 2018 मध्ये डरबन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0/64 अशी नोंद आहे.
टीम इंडिया आता 8 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना करणार आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात दुसऱ्यांदा भारत आणि न्यूझीलंड आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये आमनेसामने येणार आहेत.
याआधी दोन्ही संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यातही भिडले होते.
- मुख्यपृष्ठ
- क्रीडा
- क्रिकेट
- Ind vs Nz Final : वर्ल्डकप जिंकला रे... नरेंद्र मोदी स्टेडियमवर इतिहास घडला, भारताने किवींना हरवत पुन्हा विश्वचषक उंचावला