IND vs AUS Semi Final Mumbai Weather : मुंबईतील पावसामुळे टीम इंडियाचं विश्वचषकाचं स्वप्न भंगणार, ऑस्ट्रेलियाविरुद्धची सेमी फायनल ड्रॉ झाल्यास सगळं संपणार, काय आहे समीकरण?
Heavy Rain In Mumbai Before IND vs AUS Semi Final : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज बुधवार 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला विश्वचषक 2025 सेमीफायनल सामना रंगणार आहे.

IND-W vs AUS-W Semi Final In Mumbai : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज बुधवार 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND vs AUS Semi Final) महिला विश्वचषक 2025 सेमीफायनल सामना रंगणार आहे. हा रोमांचक नॉकआऊट सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. सात वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियासमोर पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया उतरणार आहे. मात्र भारतासाठी सध्या सर्वात मोठी अडचण प्रतिस्पर्धी नाही, तर हवामान आहे. मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.
सेमीफायनल दरम्यान हवामान कसं असेल? (IND vs AUS Semi Final Before Heavy Rain)
अहवालानुसार, भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलदरम्यान पावसाची व्यत्यय येण्याची शक्यता आहे. AccuWeather च्या माहितीनुसार, नवी मुंबईत आज तापमान 25 ते 33 अंश सेल्सियस दरम्यान राहील. दिवसभर आभाळ दाटून राहणार असून, अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 10 च्या सुमारासच शहराच्या अनेक भागांत हलका पाऊस झाला, तर किनारपट्टी भागात मुसळधार सरी आल्या आहेत. पुढील 24 तासांत मुंबईत 40 ते 70 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पावसामुळे सेमीफायनल सामना रद्द झाला तर.... (IND vs AUS Semi Final match canceled due to rain)
जर सामना सुरू असताना पाऊस अखंडपणे सुरू राहिला, तरी भारतीय चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आयसीसीने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे (Reserve Day) ठेवला आहे. म्हणजेच, जर सामना आज (30 ऑक्टोबर) पूर्ण होऊ शकला नाही, तर तो उद्या (31 ऑक्टोबर) खेळवला जाईल.
Some northern suburbs already getting rains.. From here on other parts parts of Mumbai will also start getting showers. Coastal areas will get more rains than interiors. Total rainfall next 24 hours likely to be 40-70mm. #MumbaiRains
— Mumbai Rains (@IndiaWeatherMan) October 30, 2025
पण 31 ऑक्टोबरलाही पाऊस झाला, तर?
जर सामना रिझर्व्ह डेपर्यंत गेला आणि 31 ऑक्टोबरलाही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर भारताला मोठा धक्का बसू शकतो. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला थेट फायनलसाठी पात्रता (क्वालिफिकेशन) मिळेल, तर पावसामुळे टीम इंडिया बिना खेळता बाहेर पडेल.
भारत महिला संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड.
ऑस्ट्रेलिया महिला संघ : जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, एलिसा हीली (कर्णधार), अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहॅम, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट, हीथर ग्राहम, डार्सी ब्राउन, सोफी मोलिनेक्स.
हे ही वाचा -



















