Michael Atherton on Ind Vs Pak Matches : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांदरम्यान अनेक वाद पेटलं. जेव्हा जेव्हा या दोन संघांची सामना झाला, तेव्हा कधी खेळाडूंमध्ये, तर कधी राजकारण तापले. या सगळ्यावर जगभरात चर्चा झाली आणि दोन्ही देशांवर टीकेची झोड उठली. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अँड्र्यू अ‍ॅथरटन (Michael Andrew Atherton) यांनी आयसीसीला भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

Continues below advertisement

भारत-पाक सामन्यावर बंदीची मागणी.... 

ही भूमिका नुकत्याच संपलेल्या आशिया कपनंतर समोर आली आहे. या स्पर्धेदरम्यान दोन्ही देशांतील तणाव आणि बिघडलेले संबंध स्पष्ट दिसले. खेळाडूंनी हात न मिळवणे, उचकावणारे हावभाव करणे, ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देणे अशा घटना वारंवार घडल्या. अ‍ॅथरटन यांच्या मते, क्रिकेट आता ‘क्रीडा राजनय’चे माध्यम राहिले नाही, तर दोन्ही देशांतील तणावाचे प्रतिबिंब बनले आहे. त्यांनी केवळ आर्थिक फायद्यासाठी अशा सामन्यांचे आयोजन करण्याची प्रवृत्ती थांबवावी, तसेच भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पारदर्शक ड्रॉ प्रणाली ठेवावी, असे सुचवले आहे.

Continues below advertisement

आशिया कपचा समारोप 28 सप्टेंबरला झाला, ज्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मात्र हा संपूर्ण टूर्नामेंट चुकीच्या कारणांसाठी लक्षात राहिला. पहलगाव दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मैदानावरही तणाव वाढला होता. पहिला मोठा वाद 14 सप्टेंबरला झाला, जेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला.

यानंतर सुपर फोर सामन्यात हारिस रौफ, फहीम अशरफ आणि साहिबजादा फरहान यांनी भारतीय खेळाडूंविरुद्ध उचकावणारे हावभाव केले. स्पर्धेचा शेवटही वादग्रस्त ठरला, कारण भारताने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि एसीसी-पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.

आयसीसीने आता निर्णय घ्यायला हवा

आपल्या कॉलममध्ये अ‍ॅथरटन यांनी लिहिले की, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांना आर्थिक आणि राजनैतिक कारणांमुळे प्राधान्य दिले जाते. पण आता वेळ आली आहे की ही प्रथा थांबवावी. दोन्ही देशांतील संबंध सतत बिघडत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर हे सामने जाणूनबुजून आयोजित करणे योग्य नाही.

हे ही वाचा -

Rohit Sharma News : टीम कल्चरसाठी धोका... बीसीसीआयने रोहित शर्माचं कर्णधारपद का हिसकावलं?; Inside माहिती समोर!