How Can India Qualify For Semi Final : टीम इंडियाच्या सेमीफायनलची किल्ली सध्या दक्षिण आफ्रिकाच्या हातात आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात महत्त्वाचा सामना रंगला आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. पण हा सामना फक्त दोन संघांपुरता मर्यादित नाही, तो भारताच्या सेमीफायनलच्या आशांशी थेट जोडलेला आहे.

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिका जिंकली तर भारताला कसा फायदा?

भारताच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित मोठ्या प्रमाणात आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. जर आज दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, तर त्यांचे 4 गुण होतील आणि ते थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

Continues below advertisement

त्याचवेळी भारताने झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला, तर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचे 2-2 गुण होतील. झिम्बाब्वे सलग दोन सामने गमावल्यामुळे स्पर्धेबाहेर जाईल. 

अशा परिस्थितीत सेमीफायनलच्या दुसऱ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 1 मार्चला होणारा सामना ‘करो या मरो’ ठरेल. जो संघ जिंकेल, तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.

भारताच्या सेमीफायनलचं अचूक समीकरण

भारताला पुढील तीन गोष्टी घडणे आवश्यक आहे. आज दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करणे आणि भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवणे, तर 1 मार्चला भारताने वेस्ट इंडिजला हरवणे.

यामुळेच आज संपूर्ण भारत दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. यावेळी वेस्ट इंडिजने पहिल्या 9 षटकांतच 6 महत्त्वाचे विकेट गमावले, आणि फर्त 72 धावा केल्या. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेची पकड सामन्यावर मजबूत दिसत आहे.

नेट रनरेटची चिंता संपेल!

आज वेस्ट इंडिज पराभूत झाली आणि भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवला, तर टीम इंडियाला नेट रनरेटचा विचार करण्याची गरज उरणार नाही. मग 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त विजय मिळवणे हेच एकमेव लक्ष्य असेल. 

हे ही वाचा -

Ind Vs Zim T20 World Cup 2026 : टीम इंडियाची पहिली फळी सपशेल फेल, खराब कामगिरीचा धक्कादायक आकडा, झिम्बाब्वेपेक्षाही भयंकर अवस्था