India vs Pakistan Semi-Final Scenario : सुपर-8 चं गणित सुटलं, आता भारत-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार?, संपूर्ण समीकरण एका क्लिकवर...
India vs Pakistan Semi-Final Scenario : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत ग्रुप टप्प्यात दमदार विजय मिळवला.

India vs Pakistan Semi-Final Scenario T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा वर्चस्व गाजवत ग्रुप टप्प्यात दमदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताने सुपर-8 फेरीत धडक मारली. पाकिस्ताननेही आपल्या अखेरच्या लीग सामन्यात नामिबियावर मात करत सुपर-8 मध्ये प्रवेश निश्चित केला. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान असा थरार पाहायला मिळणार का?
सुपर-8 मध्ये दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात (How Can India vs Pakistan Match Happen Again)
सुपर-8 फेरीत दोन गट करण्यात आले आहेत. भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज आहेत. तर पाकिस्तानच्या गटात न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड आहे. पाकिस्तानचा गट तुलनेने अधिक कठीण मानला जात आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि सह-यजमान श्रीलंका या तिन्ही संघांचा फॉर्म आणि अनुभव लक्षात घेतला तर पाकिस्तानसमोर मोठे आव्हान आहे.
भारत-पाकिस्तान पुन्हा कसे भिडू शकतात? (When And Where Will India vs Pakistan Semi-Final Or Final Take Place If It Happens)
ग्रुप टप्प्यात दोन्ही संघ एकाच गटात असल्याने सुपर-8 मध्ये त्यांची पुन्हा गाठ पडणार नाही. आता हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी फक्त सेमीफायनल किंवा फायनलमध्येच समोरासमोर येऊ शकतात. आयसीसीच्या नियमानुसार, एका गटातील अव्वल संघ दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सेमीफायनल खेळतो. जर भारत आपल्या गटात पहिल्या क्रमांकावर आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिला (किंवा उलट परिस्थिती), तर सेमीफायनलमध्ये भारत-पाकिस्तान लढत रंगू शकते. अन्यथा, दोन्ही संघ फक्त फायनलमध्येच एकमेकांसमोर येऊ शकतात आणि त्यासाठी दोघांनाही आपापले सेमीफायनल जिंकावे लागतील.
पाकिस्तानसमोर मोठे आव्हान
पाकिस्तानला सुपर-8 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांसारख्या मजबूत संघांना हरवावे लागेल. या तिन्ही संघांचा मोठ्या स्पर्धांमधील अनुभव आणि सातत्य पाहता पाकिस्तानचा मार्ग खडतर आहे. दुसरीकडे, भारताचा गट तुलनेने संतुलित आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांसारख्या संघांविरुद्ध भारताने पूर्वी अनेकदा विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
सामना झाला तर कुठे आणि कधी?
आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे की भारत-पाकिस्तान सेमीफायनल किंवा फायनल झाला, तर तो सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. सेमीफायनल 4 मार्च रोजी होईल, तर फायनल सामना 8 मार्च रोजी खेळवला जाईल. भारत आणि श्रीलंका 2026 टी-20 विश्वचषकाचे सह-यजमान आहेत. राजकीय कारणांमुळे दोन्ही संघ एकमेकांच्या देशात खेळणार नाहीत, त्यामुळे संभाव्य भारत-पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेतच होईल.
हे ही वाचा -





















