Asia Cup 2025 Super-4 Points Table After India beat Pakistan : आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाचा विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताने त्यांच्या पहिल्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला आणि स्पर्धेत त्यांचा सलग चौथा विजय नोंदवला. यामुळे सुपर फोरच्या पॉइंट टेबलमध्येही महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. टीम इंडियाने बांगलादेशला मागे टाकत पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे, तर बांगलादेश दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. 20 सप्टेंबरला झालेल्या रोमांचक सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला होता. पाकिस्तान टेबलमध्ये तळाशी आहे. आता, त्यांना त्यांचा पुढचा सामना जिंकावा लागेल नाहीतर पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर जाऊ शकतो.
सुपर-4 फेरीत अव्वल स्थानी टीम इंडिया
सुपर-4 मधील पहिल्या दोन सामन्यांनंतर भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या फेरीत चारही संघांना प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. पहिल्या दोन सामन्यांनंतर भारताच्या खात्यात दोन गुण (नेट रन रेट 0.689) असून तो पहिल्या स्थानी आहे. बांगलादेशकडेही दोन गुण (नेट रन रेट 0.121) आहेत, पण खराब नेट रन रेटमुळे तो दुसरा क्रमांकावर आहे.
तर, पाकिस्तानला भारताकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचा पॉइंट टेबलमध्ये नेट रन रेट (-0.689) खालावला आहे आणि ते शेवटच्या स्थानी आहेत. श्रीलंकेकडे आणि पाकिस्तानकडे समान म्हणजे शून्य गुण आहेत, पण नेट रन रेट (-0.121) चांगला असल्यामुळे श्रीलंका पाकिस्तानपेक्षा पुढे आहे.
सुपर-4 मधूनच बाहेर जाऊ शकतो पाकिस्तान
सुपर-4 मध्ये पाकिस्तानचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. पण आतापर्यंतच्या त्यांच्या खेळावरून पाहता, ते अंतिम फेरी गाठतील अशी शक्यता फारच कमी दिसते. पाकिस्तानला जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल, तर उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्याचबरोबर इतर संघांच्या निकालांवरही त्यांचा प्रवास अवलंबून असेल.
हे ही वाचा -