Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या (Asia Cup 2025) सुरुवातीला सईम अयूब (Pakistan cricketer saim ayub) पाकिस्तानसाठी सलामीवीर म्हणून खेळत होता. मात्र सलग अपयशानंतर त्याच्या जागी फखर झमानला ओपनिंगसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर अयूबचा फलंदाजी क्रम बदलण्यात आला. पण त्याचा फॉर्म मात्र तसाच राहिल्याचे दिसून आले. बांगलादेशविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात तो पुन्हा शून्यावर बाद झाला. या स्पर्धेत अयूब चौथ्यांदा ‘डक’वर बाद झाला.

फक्त सईम अयूबच नव्हे, तर गुरुवारी पाकिस्तानचे इतर फलंदाजही निराशाजनक कामगिरी करताना दिसले. साहिबजादा फरहान 4, फखर झमान 13, सलमान अली आगा 19 आणि हुसैन तलत फक्त 3 धावा करून बाद झाला. केवळ 49 धावांवर पाकिस्तानचे 5 गडी बाद झाले होते. मोहम्मद हारिस (31), शाहीन अफरीदी (19), आणि मोहम्मद नवाज (25) यांनी महत्त्वाच्या क्षणी धावा करत संघाला कसंबसं 135 पर्यंत पोहोचवलं.

पाकिस्तानने मात्र आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर हे 135 धावांचे आव्हान देखील यशस्वीरीत्या बचावले. बांगलादेश केवळ 124 धावा करू शकला आणि पाकिस्तानने हा सामना 11 धावांनी जिंकत आशिया चषक 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.

सईम अयूबच्या नावावर लाजीरवाणा विक्रम (saim ayub unwanted record)

आशिया चषक 2025 मधील सईम अयूबच्या कामगिरीकडे पाहिल्यास, तो पूर्णपणे अपयशी ठरला. ग्रुप स्टेजमधील सर्व तीन सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद झाला. सुपर-4 मध्ये त्याला भारतविरुद्ध 21 धावा आणि श्रीलंकेविरुद्ध केवळ 2 धावा करता आल्या. बांगलादेशविरुद्ध पुन्हा एकदा शून्यावर बाद होत त्याने या स्पर्धेत एकूण चार वेळा 'डक'वर बाद होण्याचा लाजीरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

या स्पर्धेत अयूबने एकूण 25 चेंडूंमध्ये केवळ 23 धावा केल्या आहेत. T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फुल मेंबर देशांच्या खेळाडूंमध्ये एका मालिकेत सर्वाधिक वेळा 'डक'वर बाद होणारा अयूब हा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम आंद्रे फ्लेचरच्या नावावर होता. तो 2009 T20 वर्ल्ड कपमध्ये तीन वेळा 'डक'वर बाद झाला होता.

अयूब फायनलमध्ये खेळणार का? (Will Saim Ayub play in the final?)

आता प्रश्न असा आहे की, अयूबला या कामगिरीनंतर फायनलमध्ये संधी दिली जाईल का? अनेक माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी त्याच्या अपयशामुळे त्याला आधीच संघाबाहेर टाकायला हवं होतं, असं मत व्यक्त केलं आहे. तरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे अयूबने गोलंदाजीत मात्र चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना सोडता बाकी सर्व सामन्यांमध्ये त्याने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली असून, एकूण 5 सामन्यांमध्ये 8 बळी घेतले आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघ व्यवस्थापन त्याच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार का की अंतिम सामन्यात त्याला संघाबाहेर बसवले जाते? हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Ind Vs Pak Asia Cup Final: भारत-पाक फायनलपूर्वी टीम इंडियाला झटका? सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागणार का?