Asia Cup Final, Weather Forecast : श्रीलंका संघाने गुरुवारी पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. दासुन शनाका याच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली. आता रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल रंगणार आहे. श्रीलंका संघ आशिया चषकाचा गतविजेता आहे, त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे. पण रविवारी कोलंबोत होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता आहे का? आशिय चषकातील काही सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रभावित झालेत. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यावेळी पावसान हजेरी लावली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता फायनलच्या थरारावेळी पावसाची शक्यता आहे. याबाबत जाऊन घेऊयात.... 


कोलंबोत रविवारी पाऊस कोसळणार का?


भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडअमवर फायनल रंगणार आहे. तब्बल सतरा सामन्यानंतर आशिया चषकाचा किंग कोण यावरुन पडदा उठणार आहे. पण या फायनलवर पावसाचे सावट आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील लढतीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोलंबोमध्ये रविवारी ढगाळ वातावरण असेल. संपूर्ण दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. रविवारी कोलंबोच्या काही भागात पावसाची शक्यता आह. दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.  भारत आणि श्रीलंका यांच्यातील फायनल सामन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, आशिया चषकाच्या फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. 


भारतीय संघासोबत श्रीलंकेचं आव्हान -   


सुपर ४ फेरीत श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न श्रीलंका संघ करणार, यात शंकाच आहे. फायनलची लढत रंगतदार होईल. भारत आणि बांगलादेश संघाचे प्रत्येकी चार चार गुण आहेत. बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये सध्या अखेरचा सुपर चार सामना सुरु आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. फायनलमद्ये भारतीय संघासोबत श्रीलंका संघाचे आव्हान असेल.  


श्रीलंकेची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली ?
श्रीलंका संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. गतविजेत्या श्रीलंका संघाने पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रलंका संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच विकेटने पराभव केला होता. त्यानंतर आफगाणिस्तानला दोन धावांनी हरवले होते. पण सुपर ४ मध्ये श्रीलंका संघाला भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता.  भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. श्रीलंकाला संघाला फायनलमध्ये भारताचा पराभव करणं कठीण जाणार आहे. श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खेळत असला तरी भारतीय संघ तुफान फॉर्मात आहे. सुपर ४ सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला २१३ धावांत रोखले होते. पण फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. श्रीलंकेचा संपूर्ण डाव १७२ धावांवर संपुष्टात आला होता.


टीम इंडिया अजिंक्य -
टीम इंडियाने आशिया चषकात आतापर्यंत अजेय आहे, एकाही सामना गमावला नाही.  पहिला सामना रद्द झाला. यानंतर नेपाळविरुद्ध १० गडी राखून विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 238 धावांनी हरवले. यानंतर श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव झाला. टीम इंडियाचा पुढील सामना आता बांगलादेशशी होणार आहे. तर अंतिम फेरीत श्रीलंकेशी दोन हात करणार आहे.